शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
4
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
5
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
6
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
7
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
8
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
9
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
10
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
11
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
12
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
13
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
14
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
15
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
16
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
17
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
18
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
19
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
20
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

रत्नागिरीत शौचालय घोटाळा

By admin | Updated: February 12, 2016 23:44 IST

नीलेश राणेंचा आरोप : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या शौचालय उभारणीमध्ये घोटाळा झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संपूर्ण माहिती बाहेर यावी, अशी मागणी रत्नागिरी - सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे दिले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी घर ते शौचालयङ्खया अभियानाला २ आॅक्टोबर २०१४पासून देशभरात सुरूवात झाली. दारिद्र्यरेषेवरील आणि दारिद्र्यरेषेखालील कोणत्याही लाभार्थीला या योजनेमध्ये शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होते. यातील ९ हजार रुपये केंद्र, तर ३ हजार रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. उर्वरित पैसे लाभार्थीने स्वत:चे भरावयाचे होते. यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ३१ डिसेंबर २०१५ची डेडलाईन देण्यात आली होती.याबाबतचे पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी ४० हजार रुपयांचा खर्चही झाल्याचे समजते. गावागावात जाऊन दवंडी पिटून ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आली. या योजनेसाठी लाभार्थी ठरविताना सन २०१४ रोजी झालेल्या बेसलाईन सर्वेक्षणाचा उपयोग केला गेला. प्रत्यक्ष लाभार्थ्याने हे शौचालय उभारणे अपेक्षित होते.योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यावेळी अनेक ठिकाणी ठेकेदाराकडून हे काम केल्याचे निदर्शनास आल्याचे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. त्याशिवाय सिमेंटचे पत्रे वापरून निकृष्ट दर्जाचे शौचालय उभारल्याचेही या वृत्तामध्ये दिसून आले. यामध्ये सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासाठी सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नीलेश राणे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावाही सुरू ठेवला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा हादरला : शासकीय यंत्रणा खडबडून जागीरत्नागिरी जिल्ह्यात शौचालय बांधणीत घोटाळा झाल्याचे वृत्त पसरताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी आवाज उठविला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.जिल्ह्यावर लक्षमाजी खासदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यात पुन्हा दौरे करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील विविध कामांकडे लक्ष देण्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. पक्ष बांधणीकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून काम.शौचालय उभारणीमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त प्रसारीत.सरकारी निधीचा गैरवापर.