शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

रत्नागिरी थांबली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

रत्नागिरी : सर्वच्या सर्व दुकाने बंद, रस्ते सुनसान, गाड्यांचा गोंगाट नाही, माणसांच्या हालचाली नाहीत. वर्दळ होती ती फक्त पोलिसांची. ...

रत्नागिरी : सर्वच्या सर्व दुकाने बंद, रस्ते सुनसान, गाड्यांचा गोंगाट नाही, माणसांच्या हालचाली नाहीत. वर्दळ होती ती फक्त पोलिसांची. कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी हे चित्र दिसत होते. कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या वाढीमुळे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक लाॅकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता. बंदोबस्तासाठी पोलीस व पोलीसमित्र तैनात होते. त्यामुळे नेहमीची वर्दळ थांबली होती.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला व्यापारी, जनतेतून सकारात्मक प्रतिसाद लाभल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्रीसुध्दा थांबविण्यात आली आहे. सकाळी दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त शहरात सर्वत्र शांतता होती. नेहमी माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणारे नागरिकही रस्त्यावर नव्हते. एखादेच वाहन रस्त्याने धावताना दिसत होते. ‘अत्यावश्यक सेवे’तील कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागत असल्याने तेवढीच ये-जा सुरू होती. पोलीस रस्त्यावर येणारे प्रत्येक वाहन थांबवून चाैकशी करत होते. शहरात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरणासाठी जाणाऱ्यांचीही चाैकशी करण्यात येत होती. लसीकरणाबाबतचा संदेश पाहिल्याखेरीज त्यांना सोडले जात नव्हते.

शहरातील परटवणे, मारुती मंदिर, नाचणे रोड, साळवी स्टाॅप , चर्मालय, कुवारबाव, एस.टी. स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घरपोच दूध विक्रीचे आवाहन केल्यामुळे सकाळी दुधाच्या गाड्या तेवढ्या फिरत होत्या. दोन तासांनंतर ही वाहनेही थांबली. त्यामुळे रस्ते मोकळे व शांत होते. पेट्रोल पंपावर ओळखपत्र तपासूनच ‘अत्यावश्यक सेवे’तील वाहनचालकांना पेट्रोल, डिझेल देण्यात येत होते. त्यामुळे पेट्रोल पंपांवरही शांतताच होती. औषधे दुकाने फक्त पूर्णवेळ सुरू आहेत.

औषध दुकाने तसेच कृषीविषयक सेवांसाठी प्रशासनाने बँकांचे व्यवहार दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बँका सुरू होत्या. ‘अत्यावश्यक सेवे’तील कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एस.टी सुरू होती. शहरी व ग्रामीण मार्गावर जेमतेम १५ ते २० फेऱ्या सुरू होत्या. मात्र, प्रवासी नव्हते. पोलीसही एस. टी. बसेसचीही तपासणी करत होते.

ग्रामीण भागात शुकशुकाट

जिल्हाभरात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले असल्याने शहराबरोबर ग्रामीण भागातही कमालीची शांतता होती. किराणा, पिठाच्या गिरण्या, पानटपऱ्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोस्ट व बँका तसेच अन्य शासकीय कार्यालयांतून कामकाज मात्र सुरू होते. ग्रामीण भागातही पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याने ग्रामस्थ घरातच होते. मान्सूनपूर्व पावसावर काही शेतकऱ्यांनी भात पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे पेरणी व मशागतीच्या कामासाठी शेतकरी शेतात असले तरी संख्या मोजकीच होती.

पावसाळी वातावरण

बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली असली तरी गुरुवारी मात्र दिवसभर विश्रांती घेतली होती. मात्र, पावसाळी मळभ असल्याने हवेत गारवा आला आहे. खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारीवगळता अन्य लोकांना सुट्टी मिळाली आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. भाज्या, मासळी, फळे विक्रेत्यांनीही दुकाने, हाॅटेल व्यवसायांतर्गत मिळणारी पार्सल सेवाही बंद ठेवली होती. छोटे-मोठे सर्वच व्यवसाय बंद असल्याने शहरातील वर्दळ थांबली होती.