शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी थांबली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

रत्नागिरी : सर्वच्या सर्व दुकाने बंद, रस्ते सुनसान, गाड्यांचा गोंगाट नाही, माणसांच्या हालचाली नाहीत. वर्दळ होती ती फक्त पोलिसांची. ...

रत्नागिरी : सर्वच्या सर्व दुकाने बंद, रस्ते सुनसान, गाड्यांचा गोंगाट नाही, माणसांच्या हालचाली नाहीत. वर्दळ होती ती फक्त पोलिसांची. कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी हे चित्र दिसत होते. कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या वाढीमुळे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक लाॅकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता. बंदोबस्तासाठी पोलीस व पोलीसमित्र तैनात होते. त्यामुळे नेहमीची वर्दळ थांबली होती.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला व्यापारी, जनतेतून सकारात्मक प्रतिसाद लाभल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्रीसुध्दा थांबविण्यात आली आहे. सकाळी दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त शहरात सर्वत्र शांतता होती. नेहमी माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणारे नागरिकही रस्त्यावर नव्हते. एखादेच वाहन रस्त्याने धावताना दिसत होते. ‘अत्यावश्यक सेवे’तील कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागत असल्याने तेवढीच ये-जा सुरू होती. पोलीस रस्त्यावर येणारे प्रत्येक वाहन थांबवून चाैकशी करत होते. शहरात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरणासाठी जाणाऱ्यांचीही चाैकशी करण्यात येत होती. लसीकरणाबाबतचा संदेश पाहिल्याखेरीज त्यांना सोडले जात नव्हते.

शहरातील परटवणे, मारुती मंदिर, नाचणे रोड, साळवी स्टाॅप , चर्मालय, कुवारबाव, एस.टी. स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घरपोच दूध विक्रीचे आवाहन केल्यामुळे सकाळी दुधाच्या गाड्या तेवढ्या फिरत होत्या. दोन तासांनंतर ही वाहनेही थांबली. त्यामुळे रस्ते मोकळे व शांत होते. पेट्रोल पंपावर ओळखपत्र तपासूनच ‘अत्यावश्यक सेवे’तील वाहनचालकांना पेट्रोल, डिझेल देण्यात येत होते. त्यामुळे पेट्रोल पंपांवरही शांतताच होती. औषधे दुकाने फक्त पूर्णवेळ सुरू आहेत.

औषध दुकाने तसेच कृषीविषयक सेवांसाठी प्रशासनाने बँकांचे व्यवहार दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बँका सुरू होत्या. ‘अत्यावश्यक सेवे’तील कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एस.टी सुरू होती. शहरी व ग्रामीण मार्गावर जेमतेम १५ ते २० फेऱ्या सुरू होत्या. मात्र, प्रवासी नव्हते. पोलीसही एस. टी. बसेसचीही तपासणी करत होते.

ग्रामीण भागात शुकशुकाट

जिल्हाभरात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले असल्याने शहराबरोबर ग्रामीण भागातही कमालीची शांतता होती. किराणा, पिठाच्या गिरण्या, पानटपऱ्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोस्ट व बँका तसेच अन्य शासकीय कार्यालयांतून कामकाज मात्र सुरू होते. ग्रामीण भागातही पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याने ग्रामस्थ घरातच होते. मान्सूनपूर्व पावसावर काही शेतकऱ्यांनी भात पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे पेरणी व मशागतीच्या कामासाठी शेतकरी शेतात असले तरी संख्या मोजकीच होती.

पावसाळी वातावरण

बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली असली तरी गुरुवारी मात्र दिवसभर विश्रांती घेतली होती. मात्र, पावसाळी मळभ असल्याने हवेत गारवा आला आहे. खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारीवगळता अन्य लोकांना सुट्टी मिळाली आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. भाज्या, मासळी, फळे विक्रेत्यांनीही दुकाने, हाॅटेल व्यवसायांतर्गत मिळणारी पार्सल सेवाही बंद ठेवली होती. छोटे-मोठे सर्वच व्यवसाय बंद असल्याने शहरातील वर्दळ थांबली होती.