शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

रत्नागिरी : पाणी योजनेवरील स्थगिती उठवावी,  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:54 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी पाणी योजनेवरील स्थगिती उठवावी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती तत्काळ उठवली जावी व सध्याचा ठेका रद्द करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे योजनेचे काम देण्यात यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.या मागण्यांचे निवेदन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश नगर परिषद जावक क्र. १८६ / ३३३०, दि. ८ एप्रिल २०१७ अन्वये ठेकेदाराला देण्यात आला आहे. राजकीय साठमारीमध्ये या योजनेला कोकण विभाग आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती तत्काळ उठवावी व रत्नागिरीची सुधारित नळपाणी योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये योजनेवरील स्थगिती तत्काळ उठविणे, सध्याचा ठेका रद्द करून जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत योजनेचे काम करणे, योजनेची मूळ उद्दिष्टे, लाभ, हाती घ्यावयाची कामे व योजनेचा भविष्यात किती वर्षे लाभ होणार आहे, कामाची गुणवत्ता जाहीर करणे, यांचा समावेश आहे. राज्यात सेना भाजपची सत्ता आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत, मग योजनेला विलंब का, असा सवाल वाडेकर यांनी केला आहे.पाण्याचा ठणठणाटसुधारित पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने रत्नागिरीकरांच्या पाणी समस्येत अधिकच वाढ झाली आहे. पाणी योजना राजकीय साठमारीत सापडल्याने शहरातील पाणी समस्या गंभीर बनली आहे, असे अशोक वाडेकर म्हणाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण