शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रत्नागिरी : पाणी योजनेवरील स्थगिती उठवावी,  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:54 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी पाणी योजनेवरील स्थगिती उठवावी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती तत्काळ उठवली जावी व सध्याचा ठेका रद्द करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे योजनेचे काम देण्यात यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.या मागण्यांचे निवेदन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश नगर परिषद जावक क्र. १८६ / ३३३०, दि. ८ एप्रिल २०१७ अन्वये ठेकेदाराला देण्यात आला आहे. राजकीय साठमारीमध्ये या योजनेला कोकण विभाग आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती तत्काळ उठवावी व रत्नागिरीची सुधारित नळपाणी योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये योजनेवरील स्थगिती तत्काळ उठविणे, सध्याचा ठेका रद्द करून जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत योजनेचे काम करणे, योजनेची मूळ उद्दिष्टे, लाभ, हाती घ्यावयाची कामे व योजनेचा भविष्यात किती वर्षे लाभ होणार आहे, कामाची गुणवत्ता जाहीर करणे, यांचा समावेश आहे. राज्यात सेना भाजपची सत्ता आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत, मग योजनेला विलंब का, असा सवाल वाडेकर यांनी केला आहे.पाण्याचा ठणठणाटसुधारित पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने रत्नागिरीकरांच्या पाणी समस्येत अधिकच वाढ झाली आहे. पाणी योजना राजकीय साठमारीत सापडल्याने शहरातील पाणी समस्या गंभीर बनली आहे, असे अशोक वाडेकर म्हणाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण