शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

ST Strike : रत्नागिरीतील एस. टी. कर्मचाऱ्यांचे विठूरायाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 13:08 IST

रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु आहे. ...

रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु आहे. जो पर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन चालूच ठेवण्याची शपथ रत्नागिरीतील आंदोलक कर्मचार्‍यांनी घेतली आहे. 

आज, सोमवारी सकाळी एसटी कर्मचार्‍यांनी विभागीय कार्यालय येथे कार्तिकी एकादशी निमित्त विठूरायाची पूजा व आरती करुन आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्यात यासाठी विठूरायाला साकडं घातले. तसेच पांडुरंगाचा जयघोष केला. यावेळी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना सर्व कर्मचार्‍यांनी श्रध्दांजली वाहिली.

एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, संपाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या बैठका सुरु आहेत. मात्र, यावर अद्याप तरी तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यावर ठाम आहेत. शासनाकडून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, संपात काही ठिकाणी फूट पडल्याचे दिसून आले. राज्यातील अनेक आगारातून एसटी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र याला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागल्याचे समोर आले. काल, रविवारी सांगली जिल्ह्यातील मिरज आगारातून सुटलेल्या एसटीवर कोल्हापुरात दगडफेक झाल्याची घटना घडली. तर चालकाला बेदम मारहाण देखील करण्यात आली. यामुळे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप