शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

रत्नागिरी: स्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथम, ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:48 IST

सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट ग्राममध्ये पाचल प्रथमरत्नागिरी जिल्हा : ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार

रत्नागिरी / पाचल : सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, मुख्या लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने ग्रामपंचायतीला भेट देऊन केलेल्या गुणांकानुसार पाचल ग्रामपंचायतीला स्वच्छतेत १४, व्यवस्थापनात १८, दायित्व १२, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरणात २० पारदर्शकता व पर्यावरणात ९ असे एकून ७३ गुण मिळाले.या ग्रामपंचायतीला यापूर्वी निर्मळ ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, स्वच्छता भारत मिशनअंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्मार्ट ग्राम पाचलमधील सर्व शाळा, अंगणवाड्या, आरोग्य विभाग, पाचल हायस्कूल, खापणे महाविद्यालय, पोलीस स्थानक, महावितरण कंपनी, सर्व बचत गट, सहकारी सेवा सोसायट्या आदींनी यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

स्मार्ट ग्रामसाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी ए. जे. नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम सुतार, सिध्दार्थ जाधव, विनायक सक्रे, शंकर पाथरे, पूर्वा पाथरे, रजिया गडकरी, विजया तेलंग, श्रध्दा जाधव, मनीषा बेर्डे, तेजल सुतार यानी सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी