शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
7
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
8
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
9
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
11
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
12
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
13
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
14
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
15
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
16
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
17
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
19
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
20
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रवासी जलवाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याच्या आदेशाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:45 IST

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देबंदर विभागाच्या आदेशाने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातप्रवासी जलवाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याच्या आदेशाने खळबळ

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ऐन परीक्षा काळात या विद्यार्थ्यांसाठी हा विषय अडचणीचा ठरणार आहे.भातगाव - करजुवेसह संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना भातगाव खाडीतून नौका बोट हा एकमेव पर्याय आहे. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आहे. यामुळे भातगाव - करजुवे याठिकाणी कोणतीही वैद्यकीय सुविधा तसेच उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही.

इथल्या प्रत्येकाला रोजगारासाठी अथवा शासकीय कामासाठी, बाजारहाट करण्यासाठी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होडी हाच एकमेव पर्याय आहे. याठिकाणी आजारी व्यक्तीला उपचारांसाठीही होडीतूनच माखजन, डेरवण अथवा अन्यत्र घेऊन जावे लागते. याठिकाणी पूल नसल्याने होडीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने साऱ्यांसाठीच अडचण निर्माण झाली आहे.सध्या भातगाव, कोसबी आदी ठिकाणांहून १०वी, १२वीतील सुमारे ६० विद्यार्थी करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जातात. मात्र, अचानक येथील होडी बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय होणार आहे. दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाल्या आहेत.

या परीक्षांना होडी बंदच्या निर्णयामुळे मुकावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत होडी चालकांशी संपर्क साधला असता, बंदर विभागाच्या अटींची पूर्तता केली आहे. नौका सर्वेक्षण वैध प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी मिळाल्यास पूर्ण करणार असल्याचे सांगितले.येथील नौकाचालक हे निरक्षर असून, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांनी होडी सुरु ठेवली होती. परंतु अचानक आलेल्या बंदर विभागाच्या पत्रामुळे सध्या ही होडी बंद ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater transportजलवाहतूक