शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

रत्नागिरी : प्रवासी जलवाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याच्या आदेशाने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:45 IST

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देबंदर विभागाच्या आदेशाने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातप्रवासी जलवाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याच्या आदेशाने खळबळ

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ऐन परीक्षा काळात या विद्यार्थ्यांसाठी हा विषय अडचणीचा ठरणार आहे.भातगाव - करजुवेसह संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना भातगाव खाडीतून नौका बोट हा एकमेव पर्याय आहे. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आहे. यामुळे भातगाव - करजुवे याठिकाणी कोणतीही वैद्यकीय सुविधा तसेच उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही.

इथल्या प्रत्येकाला रोजगारासाठी अथवा शासकीय कामासाठी, बाजारहाट करण्यासाठी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होडी हाच एकमेव पर्याय आहे. याठिकाणी आजारी व्यक्तीला उपचारांसाठीही होडीतूनच माखजन, डेरवण अथवा अन्यत्र घेऊन जावे लागते. याठिकाणी पूल नसल्याने होडीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने साऱ्यांसाठीच अडचण निर्माण झाली आहे.सध्या भातगाव, कोसबी आदी ठिकाणांहून १०वी, १२वीतील सुमारे ६० विद्यार्थी करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जातात. मात्र, अचानक येथील होडी बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय होणार आहे. दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाल्या आहेत.

या परीक्षांना होडी बंदच्या निर्णयामुळे मुकावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत होडी चालकांशी संपर्क साधला असता, बंदर विभागाच्या अटींची पूर्तता केली आहे. नौका सर्वेक्षण वैध प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी मिळाल्यास पूर्ण करणार असल्याचे सांगितले.येथील नौकाचालक हे निरक्षर असून, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांनी होडी सुरु ठेवली होती. परंतु अचानक आलेल्या बंदर विभागाच्या पत्रामुळे सध्या ही होडी बंद ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater transportजलवाहतूक