शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सागरी परिक्रमा यात्रेची आज रत्नागिरीत सांगता, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

By शोभना कांबळे | Updated: May 17, 2023 17:38 IST

केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरशोत्तम रूपाला तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

शोभना कांबळे

रत्नागिरी : सागर परिक्रमा कार्यक्रम-२०२३ (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेची सांगता गुरुवार, १८ मे रोजी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाने (Fisheries Department) “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ही यात्रा आयोजित केली असून सांगता कार्यक्रमाला केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री परशोत्तम रूपाला तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

सागर परिक्रमा कार्यक्रम-२०२३ (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि.२० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सातपाटी येथून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा “देशाची अन्नसुरक्षा, किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छीमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा” या मुद्यांवर केंद्रित आहे. या सागर परिक्रमा यात्रेचे हे पाचवे चरण उरण तालुक्यातील करंजा येथून दि. १७ मे २०२३ रोजी सुरू होऊन दि. १८ मे रोजी रत्नागिरी येथे समाप्त होईल. ही सागर परिक्रमा यात्रा करंजा, मिरकरवाडा व मिऱ्या बंदर व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे.

या यात्रेतून प्रगतशील मच्छीमार मुख्यत्वे किनारी भागात निवास करणारे मच्छीमार, मत्स्य शेतकरी, तरुण मत्स्य उद्योजक आदींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), केसीसी FIDF आणि महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसायविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री परशोत्तम रूपाला व राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्ह्यातील सर्व लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य आणि राज्य व केंद्र शासनाचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिक्रमेत राज्याचे मत्स्य अधिकारी, मच्छीमारांचे प्रतिनिधी, मत्स्य व्यावसायिक, मत्स्य उद्योजक, मत्स्यसंवर्धक, अधिकारी आणि राज्य, देशभरातील मत्स्य शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.

किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मच्छीमार, मस्य व्यवसायाशी निगडित असलेल्या समुदायाशी आणि हितधारकांशी संवाद साधणे, हा या यात्रेचा उद्देश असून ही परिक्रमा संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवरील राज्याच्या समुद्रमार्गातून जाणार आहे. दुपारी ४ ते रात्री ८:३० वाजेपर्यंतच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी, मत्स्य व्यावसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मत्स्यविभागाचे सहाय्यक आयुक्त ना. वि. भादुले यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी