शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली वाहने परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:46 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली वाहने परतस्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागणार

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणुक शाखेकडे जमा केल्या.

लोकसभा निवडणुक जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीनिमित्ताने देशभरात आचारसंहिला लागू करण्यात आली आहे.

या आचारसंहितेमुळे सर्वच लोकप्रतिनिधींना कोणत्याही शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही. तसेच कोणत्याही विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजनही करण्यास बंदी घालण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, शिक्षण व वित्त सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी आणि जिल्ह्यातील नऊही पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहने वापरतात.

लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने निवडणुक विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. ते आदेश आज पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले.

त्यानंतर त्यांनी निवडणुक विभागाकडे शासकीय वाहने जमा केली. त्यामुळे आता या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत दौरे करताना किंवा कार्यालयात येताना स्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Ratnagiriरत्नागिरी