शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रत्नागिरीचा निकाल ९४ टक्के

By admin | Updated: June 3, 2014 01:59 IST

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा : सावित्रीच्या लेकी मुलांपेक्षा यंदाही सरस

रत्नागिरी : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०१४ चा आॅनलाईन निकाल आज जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मुलींची टक्केवारी यंदाही मुलांच्या तुलनेत जास्त आहे. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेचा निकाल मात्र अतिशय कमी म्हणजे ३३.६६ टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात एकूण २०३७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९२०३ विद्यार्थी (९४.२४ टक्के) उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३५ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४१ आहे. या परीक्षेसाठी १०,८७३ विद्यार्थी बसले. त्यापैकी १०.०४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९५०३ मुलींपैकी ९१६२ (९६.४१ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.१३ टक्के लागला असून ७३१ पैकी ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल ‘वाणिज्य’चा निकाल ९६.६५ टक्के लागला असून ७६३९ विद्यार्थ्यांपैकी ७३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ९३.१६ लागला असून ५१५७ विद्यार्थ्यांपैकी ४८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर कला शाखेचा निकाल ९२.०७ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ६८१९ विद्यार्थ्यांपैकी ६२७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमानुसार, जिल्ह्यात एकूण ९२१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. त्यापैकी ३१० विद्यार्थी (३३.६६ टक्के) उत्तीर्ण झाले. एकूण ६५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९८ (३०.३२ टक्के) उत्तीर्ण झाले, तर एकूण २६८ विद्यार्थिनींपैकी ११२ मुली (४१.७९ टक्के) उत्तीर्ण झाल्या. एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ६२.५० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या ८ पैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ३५.३८ टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या १९५ विद्यार्थ्यांपैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘कला’चा निकाल ३६.६४ टक्के लागला असून, ३६३ विद्यार्थ्यांपैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल २९.०१ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ३५५ विद्यार्थ्यांपैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमासाठी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणार्‍या निकालपत्राचे वाटप दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)