शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

रत्नागिरीचा निकाल ९४ टक्के

By admin | Updated: June 3, 2014 01:59 IST

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा : सावित्रीच्या लेकी मुलांपेक्षा यंदाही सरस

रत्नागिरी : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०१४ चा आॅनलाईन निकाल आज जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मुलींची टक्केवारी यंदाही मुलांच्या तुलनेत जास्त आहे. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेचा निकाल मात्र अतिशय कमी म्हणजे ३३.६६ टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात एकूण २०३७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९२०३ विद्यार्थी (९४.२४ टक्के) उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३५ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४१ आहे. या परीक्षेसाठी १०,८७३ विद्यार्थी बसले. त्यापैकी १०.०४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९५०३ मुलींपैकी ९१६२ (९६.४१ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.१३ टक्के लागला असून ७३१ पैकी ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल ‘वाणिज्य’चा निकाल ९६.६५ टक्के लागला असून ७६३९ विद्यार्थ्यांपैकी ७३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ९३.१६ लागला असून ५१५७ विद्यार्थ्यांपैकी ४८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर कला शाखेचा निकाल ९२.०७ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ६८१९ विद्यार्थ्यांपैकी ६२७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमानुसार, जिल्ह्यात एकूण ९२१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. त्यापैकी ३१० विद्यार्थी (३३.६६ टक्के) उत्तीर्ण झाले. एकूण ६५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९८ (३०.३२ टक्के) उत्तीर्ण झाले, तर एकूण २६८ विद्यार्थिनींपैकी ११२ मुली (४१.७९ टक्के) उत्तीर्ण झाल्या. एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ६२.५० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या ८ पैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ३५.३८ टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या १९५ विद्यार्थ्यांपैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘कला’चा निकाल ३६.६४ टक्के लागला असून, ३६३ विद्यार्थ्यांपैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल २९.०१ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ३५५ विद्यार्थ्यांपैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमासाठी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणार्‍या निकालपत्राचे वाटप दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)