शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

रत्नागिरी : महावितरणच्या वसुलीत कोकण विभाग द्वितीय, विक्रमी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:46 IST

महावितरण कंपनीकडून राज्यातील सर्व विभागांना दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. शिवाय वर्षभरातील संपूर्ण कामकाजाचा आढावाही घेण्यात येत असतो. कोकण परिमंडलाने यावर्षी विक्रमी वसुली करीत महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक भांडूप परिमंडलने पटकावला आहे.

ठळक मुद्दे महावितरणच्या वसुलीत कोकण विभाग द्वितीयकोकण परिमंडलाविक्रमी वसुली

रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून राज्यातील सर्व विभागांना दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. शिवाय वर्षभरातील संपूर्ण कामकाजाचा आढावाही घेण्यात येत असतो. कोकण परिमंडलाने यावर्षी विक्रमी वसुली करीत महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक भांडूप परिमंडलने पटकावला आहे.महावितरण कंपनीतर्फे सर्व पातळ्यांवर कामकाजाचा आढावा घेतला जात असताना केवळ वसुलीमध्येच नाही तर परिमंडलात असलेल्या वीज हानीचा आढावा, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, वीज जोडण्यांची परिस्थिती, फिडरनिहाय भारनियमन आदी निकषांवर गुणांक दिले जातात. दि. १ एप्रिल ते दि. ३१ मार्चअखेर कोकण परिमंडलाने ९९.६४ टक्के विक्रमी वसुली करून राज्यात व्दितीय क्रमांक मिळवला आहे.राज्यातील १६ परिमंडलांतर्गत यावर्षी भांडूप परिमंडलाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. भांडुप परिमंडलाची वीज वसुली ९९.८२ टक्के इतकी आहे. पुणे विभागाने ९८.६० टक्के वसुली करीत तृतीय क्रमांक कायम राखला आहे. कोकण प्रदेशचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांनी या यशाबद्दल मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर, सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. 

कोकणातील जनतेत वक्तशीरपणामहावितरणच्या यशात सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहेच, पण त्याशिवाय कोकणातील जनता शासकीय देणी वक्तशीरपणे भरतात. यामुळेच हे शक्य झाले. सर्व कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व तांत्रिक कर्मचारी तसेच आस्था विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी मेहनत घेतल्यामुळेच विक्रमी वसुली करण्यात यश आले.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी