शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
5
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
6
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
7
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
8
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
9
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
10
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
12
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
13
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
14
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
15
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
16
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
17
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
18
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
19
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
20
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...

रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हे, उमेदवारानुसार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:54 IST

गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.

ठळक मुद्देगुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हेउमेदवारानुसार मतदान

संकेत गोयथळेगुहागर : गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.वर्षभरापूर्वीच कुणबी समाजाने राष्ट्रवादीविरोधी बंड पुकारल्याने या गुहागर निवडणुकीत जातीयतेचा रंग चढणार, हे निश्चित झाले होते. प्रत्यक्षातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने राष्ट्रवादीसह भाजपलाही बसला आहे. परंतु, दोन्ही पक्षांची या निवडणुकीतील भूमिका मात्र भिन्न आहे. नगरपंचायतमध्ये झालेली कोट्यवधींची कामेच राष्ट्रवादीच्या मुळावर येत आहेत.

या वादातूनच कुणबी समाजाने बंड पुकारला. एवढेच नव्हे तर काही राष्ट्रवादी कार्यकर्तेही यामुळे दुरावलेले दिसत आहेत. तरीही न डगमगता राष्ट्रवदीने १७ जागांवर उमेदवार देऊन आम्ही लढण्यासाठी तयार आहोत, असे जाहीर आव्हान दिले. भाजपची या निवडणुकीतील भूमिका मात्र दुटप्पीपणाची दिसून येत आहे.

काही महिने आधीच आघाडीसोबत भाजपची चर्चा चालू होती. राष्ट्रवादी पक्ष असल्याने कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढवेल, या भाजपच्या ठाम भूमिकेवरुन प्रत्यक्षात आघाडी होऊ शकली नाही. शिवसेनेने मात्र आता वॉर्ड २ व वॉर्ड १२ मधून दोनच उमेदवार उभे केले आहेत.कुणबी समाजातील मोठा गट हा राष्ट्रवादी व भाजप समर्थक आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत आघाडी होऊ न शकल्याने राष्ट्रवादीसह भाजपही आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना गोंजारुन मते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून इतकी वर्ष ज्या पक्षाबरोबर आपण ठाम राहिलो, खांद्याला खांदा लावून कामे केली त्या पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा साद घालत असताना या कार्यकर्त्यांचा जीव कासावीस होत आहे.

अनेक ठिकाणी घराघरातून वाद होण्याची स्थिती येऊन ठेपली आहे. कारण एकाच घरातील दोघे भाऊ दोन पक्षात तर काही ठिकाणी वडील-मुलगा एकमेकांसमोर उभे राहिल्याने नात्यातील ओलावा संपून राजकीय द्वंद्व होते की काय, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.पक्षपातळीवरील निवडणुकीची रणनिती लक्षात घेता, सर्वसामान्य लोकांना न समजणारी आहे. काही वॉर्डमधून भाजपला अंतर्गत सहकार्य करुन आपले उमेदवार कसे निवडून येतील, याची चर्चा होताना दिसत आहे. यामधून पक्षनिष्ठेने काम करणारा सामान्य कार्यकर्ता व मतदारही भांबावलेला दिसून येत आहे.

राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे या पक्षाचे संघटन मात्र धोक्यात येऊ शकते याची काळजी न करता, गुहागरच्या निवडणुकीसाठी काहीही अशा भूमिकेत पक्ष नेतृत्व काम करताना दिसत आहे.मतदार संभ्रमितदबावाच्या राजकारणात मतदार मात्र चांगलाच संभ्रमित झाला आहे. मतदान कुणाला करावे, हे सांगताना आपल्या उमेदवारला मतदान केले नाहीत तर लगेचच आम्हाला कळेल, अशी यंत्रणा आमच्याकडे आहे, असे सांगून मतदाराच्या भोळेपणाचा फायदाही घेतला जात आहे. उमेदवार म्हणून आपण कसे आहोत व मतदानाचे आव्हान करताना आपली ध्येयधोरणे काय? वॉर्डातील विकासाचा आराखडा काय आहे, याचा प्रचार केला जात नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक