शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हे, उमेदवारानुसार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:54 IST

गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.

ठळक मुद्देगुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हेउमेदवारानुसार मतदान

संकेत गोयथळेगुहागर : गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.वर्षभरापूर्वीच कुणबी समाजाने राष्ट्रवादीविरोधी बंड पुकारल्याने या गुहागर निवडणुकीत जातीयतेचा रंग चढणार, हे निश्चित झाले होते. प्रत्यक्षातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने राष्ट्रवादीसह भाजपलाही बसला आहे. परंतु, दोन्ही पक्षांची या निवडणुकीतील भूमिका मात्र भिन्न आहे. नगरपंचायतमध्ये झालेली कोट्यवधींची कामेच राष्ट्रवादीच्या मुळावर येत आहेत.

या वादातूनच कुणबी समाजाने बंड पुकारला. एवढेच नव्हे तर काही राष्ट्रवादी कार्यकर्तेही यामुळे दुरावलेले दिसत आहेत. तरीही न डगमगता राष्ट्रवदीने १७ जागांवर उमेदवार देऊन आम्ही लढण्यासाठी तयार आहोत, असे जाहीर आव्हान दिले. भाजपची या निवडणुकीतील भूमिका मात्र दुटप्पीपणाची दिसून येत आहे.

काही महिने आधीच आघाडीसोबत भाजपची चर्चा चालू होती. राष्ट्रवादी पक्ष असल्याने कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढवेल, या भाजपच्या ठाम भूमिकेवरुन प्रत्यक्षात आघाडी होऊ शकली नाही. शिवसेनेने मात्र आता वॉर्ड २ व वॉर्ड १२ मधून दोनच उमेदवार उभे केले आहेत.कुणबी समाजातील मोठा गट हा राष्ट्रवादी व भाजप समर्थक आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत आघाडी होऊ न शकल्याने राष्ट्रवादीसह भाजपही आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना गोंजारुन मते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून इतकी वर्ष ज्या पक्षाबरोबर आपण ठाम राहिलो, खांद्याला खांदा लावून कामे केली त्या पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा साद घालत असताना या कार्यकर्त्यांचा जीव कासावीस होत आहे.

अनेक ठिकाणी घराघरातून वाद होण्याची स्थिती येऊन ठेपली आहे. कारण एकाच घरातील दोघे भाऊ दोन पक्षात तर काही ठिकाणी वडील-मुलगा एकमेकांसमोर उभे राहिल्याने नात्यातील ओलावा संपून राजकीय द्वंद्व होते की काय, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.पक्षपातळीवरील निवडणुकीची रणनिती लक्षात घेता, सर्वसामान्य लोकांना न समजणारी आहे. काही वॉर्डमधून भाजपला अंतर्गत सहकार्य करुन आपले उमेदवार कसे निवडून येतील, याची चर्चा होताना दिसत आहे. यामधून पक्षनिष्ठेने काम करणारा सामान्य कार्यकर्ता व मतदारही भांबावलेला दिसून येत आहे.

राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे या पक्षाचे संघटन मात्र धोक्यात येऊ शकते याची काळजी न करता, गुहागरच्या निवडणुकीसाठी काहीही अशा भूमिकेत पक्ष नेतृत्व काम करताना दिसत आहे.मतदार संभ्रमितदबावाच्या राजकारणात मतदार मात्र चांगलाच संभ्रमित झाला आहे. मतदान कुणाला करावे, हे सांगताना आपल्या उमेदवारला मतदान केले नाहीत तर लगेचच आम्हाला कळेल, अशी यंत्रणा आमच्याकडे आहे, असे सांगून मतदाराच्या भोळेपणाचा फायदाही घेतला जात आहे. उमेदवार म्हणून आपण कसे आहोत व मतदानाचे आव्हान करताना आपली ध्येयधोरणे काय? वॉर्डातील विकासाचा आराखडा काय आहे, याचा प्रचार केला जात नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक