शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

रत्नागिरी : गुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हे, उमेदवारानुसार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:54 IST

गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.

ठळक मुद्देगुहागर नगरपंचायतीत पक्षानुसार नव्हेउमेदवारानुसार मतदान

संकेत गोयथळेगुहागर : गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आता पक्षपातळीवरील न राहता आपल्या प्रभागातील उमेदवार कोण, यावर मतदार आपले मत कुठे देणार, हे ठरवू लागला आहे. या निवडणुकीला जातीयतेचा रंग चढल्याने व निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या संघर्षातून घराघरात वाद होताना दिसत आहे.वर्षभरापूर्वीच कुणबी समाजाने राष्ट्रवादीविरोधी बंड पुकारल्याने या गुहागर निवडणुकीत जातीयतेचा रंग चढणार, हे निश्चित झाले होते. प्रत्यक्षातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने राष्ट्रवादीसह भाजपलाही बसला आहे. परंतु, दोन्ही पक्षांची या निवडणुकीतील भूमिका मात्र भिन्न आहे. नगरपंचायतमध्ये झालेली कोट्यवधींची कामेच राष्ट्रवादीच्या मुळावर येत आहेत.

या वादातूनच कुणबी समाजाने बंड पुकारला. एवढेच नव्हे तर काही राष्ट्रवादी कार्यकर्तेही यामुळे दुरावलेले दिसत आहेत. तरीही न डगमगता राष्ट्रवदीने १७ जागांवर उमेदवार देऊन आम्ही लढण्यासाठी तयार आहोत, असे जाहीर आव्हान दिले. भाजपची या निवडणुकीतील भूमिका मात्र दुटप्पीपणाची दिसून येत आहे.

काही महिने आधीच आघाडीसोबत भाजपची चर्चा चालू होती. राष्ट्रवादी पक्ष असल्याने कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढवेल, या भाजपच्या ठाम भूमिकेवरुन प्रत्यक्षात आघाडी होऊ शकली नाही. शिवसेनेने मात्र आता वॉर्ड २ व वॉर्ड १२ मधून दोनच उमेदवार उभे केले आहेत.कुणबी समाजातील मोठा गट हा राष्ट्रवादी व भाजप समर्थक आहे. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत आघाडी होऊ न शकल्याने राष्ट्रवादीसह भाजपही आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना गोंजारुन मते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून इतकी वर्ष ज्या पक्षाबरोबर आपण ठाम राहिलो, खांद्याला खांदा लावून कामे केली त्या पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा साद घालत असताना या कार्यकर्त्यांचा जीव कासावीस होत आहे.

अनेक ठिकाणी घराघरातून वाद होण्याची स्थिती येऊन ठेपली आहे. कारण एकाच घरातील दोघे भाऊ दोन पक्षात तर काही ठिकाणी वडील-मुलगा एकमेकांसमोर उभे राहिल्याने नात्यातील ओलावा संपून राजकीय द्वंद्व होते की काय, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.पक्षपातळीवरील निवडणुकीची रणनिती लक्षात घेता, सर्वसामान्य लोकांना न समजणारी आहे. काही वॉर्डमधून भाजपला अंतर्गत सहकार्य करुन आपले उमेदवार कसे निवडून येतील, याची चर्चा होताना दिसत आहे. यामधून पक्षनिष्ठेने काम करणारा सामान्य कार्यकर्ता व मतदारही भांबावलेला दिसून येत आहे.

राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे या पक्षाचे संघटन मात्र धोक्यात येऊ शकते याची काळजी न करता, गुहागरच्या निवडणुकीसाठी काहीही अशा भूमिकेत पक्ष नेतृत्व काम करताना दिसत आहे.मतदार संभ्रमितदबावाच्या राजकारणात मतदार मात्र चांगलाच संभ्रमित झाला आहे. मतदान कुणाला करावे, हे सांगताना आपल्या उमेदवारला मतदान केले नाहीत तर लगेचच आम्हाला कळेल, अशी यंत्रणा आमच्याकडे आहे, असे सांगून मतदाराच्या भोळेपणाचा फायदाही घेतला जात आहे. उमेदवार म्हणून आपण कसे आहोत व मतदानाचे आव्हान करताना आपली ध्येयधोरणे काय? वॉर्डातील विकासाचा आराखडा काय आहे, याचा प्रचार केला जात नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक