शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

रत्नागिरी -पावसाने शेतीला तारले

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

स्थिती समाधानकारक : उत्पादन मात्र घटण्याची शक्यता

रत्नागिरी : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील भातशेती धोक्यात आली होती. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. बहुतांश काही ठिकाणी भातरोपांची वाढ खुंटलेली दिसून येत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे भात, नागली, तृणधान्य, भाजीपाला शेतीला तारला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाला उशिराने सुरूवात झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतीची स्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात भात, नागली, तृणधान्य व भाजीपाला लागवड प्रक्रिया करण्यात आली आहे. पैकी ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तसेच २ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. तृणधान्य ४१६ हेक्टर क्षेत्रावर, कारळा ३३, भाजीपाला ६१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे.लागवडीच्या कालावधीतही पाऊस लांबल्याने लागवड नेहमीपेक्षा उशिरा झाली. लागवडीचा कालावधी लांबल्यामुळे रोपवाटिकेत फुटवे प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हळव्या, निमगरव्या भाताच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शिवाय पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे कातळावरील शेतीवर करपा रोग व लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी एकूणच उत्पादकता घटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.हळवी भात तयार होण्यासाठी २१ दिवस, निमगरव्या भातासाठी २५ दिवस, तर गरव्या भातासाठी २८ दिवसांचा कालावधी लागतो. जूनमध्ये भाताची पेरणी करण्यात आली. मात्र, लागवड आॅगस्टमध्ये पूर्ण झाली. हळव्या भाताच्या रोपवाटिकेत फुटवे येण्याची प्रक्रिया झाली. हळव्या जातीच्या भाताला फुटवे येऊन फुलोरा येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरून ही प्रक्रिया दिसत नसली तरी आतून लोंबी येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पाऊस गायब झाल्याने भात काही ठिकाणी वाळले. त्यामुळे हळव्या व निमगरव्या भाताच्या उत्पादनावर ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरव्या जातीच्या भाताला मात्र तितकासा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)