शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

रत्नागिरी -पावसाने शेतीला तारले

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

स्थिती समाधानकारक : उत्पादन मात्र घटण्याची शक्यता

रत्नागिरी : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील भातशेती धोक्यात आली होती. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. बहुतांश काही ठिकाणी भातरोपांची वाढ खुंटलेली दिसून येत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे भात, नागली, तृणधान्य, भाजीपाला शेतीला तारला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाला उशिराने सुरूवात झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतीची स्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात भात, नागली, तृणधान्य व भाजीपाला लागवड प्रक्रिया करण्यात आली आहे. पैकी ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तसेच २ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. तृणधान्य ४१६ हेक्टर क्षेत्रावर, कारळा ३३, भाजीपाला ६१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे.लागवडीच्या कालावधीतही पाऊस लांबल्याने लागवड नेहमीपेक्षा उशिरा झाली. लागवडीचा कालावधी लांबल्यामुळे रोपवाटिकेत फुटवे प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हळव्या, निमगरव्या भाताच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शिवाय पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे कातळावरील शेतीवर करपा रोग व लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी एकूणच उत्पादकता घटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.हळवी भात तयार होण्यासाठी २१ दिवस, निमगरव्या भातासाठी २५ दिवस, तर गरव्या भातासाठी २८ दिवसांचा कालावधी लागतो. जूनमध्ये भाताची पेरणी करण्यात आली. मात्र, लागवड आॅगस्टमध्ये पूर्ण झाली. हळव्या भाताच्या रोपवाटिकेत फुटवे येण्याची प्रक्रिया झाली. हळव्या जातीच्या भाताला फुटवे येऊन फुलोरा येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरून ही प्रक्रिया दिसत नसली तरी आतून लोंबी येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पाऊस गायब झाल्याने भात काही ठिकाणी वाळले. त्यामुळे हळव्या व निमगरव्या भाताच्या उत्पादनावर ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरव्या जातीच्या भाताला मात्र तितकासा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)