शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

रत्नागिरी :  नियोजनमधील १८३ कोटींपैकी ४ कोटीच खर्च : नीलेश राणे यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:05 IST

रत्नागिरी जिल्ह्याचा विकासच खुंटला आहे, विकासाचे वाटोळे झाले आहे. मात्र, पालकमंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांना याचे कोणतेही देणेघेणे नाही. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असा घणाघाती टोला स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

ठळक मुद्दे नियोजनमधील १८३ कोटींपैकी ४ कोटीच खर्च : नीलेश राणे यांचा घणाघात जिल्हा विकासाचे वाटोळे केल्याचा पालकमंत्र्यांवर आरोप

रत्नागिरी : जिल्हा नियोजन मंडळाच्या चार बैठका होऊनही त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १८३ कोटींचा निधी उपलब्ध असून, विविध खात्यांवर २८ कोटी ५० लाख जमा झाले आहेत. त्यामधील ४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. १७९ कोटी निधी तसाच पडून आहे.

जिल्ह्याचा विकासच खुंटला आहे, विकासाचे वाटोळे झाले आहे. मात्र, पालकमंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांना याचे कोणतेही देणेघेणे नाही. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असा घणाघाती टोला स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.२०१७-१८ या आर्थिक वर्षातही अशीच स्थिती होती. त्यावेळीही जिल्हा नियोजन मंडळाचे ९९ कोटी अखर्चित राहिले होते. ते पुढील वर्षासाठी वर्ग करण्यात आले होते. यावर्षी त्यापेक्षा भयावह स्थिती आहे. १८३ कोटी निधीची तरतूद असतानाही डिसेंबर २०१८च्या या दिवसापर्यंत विकासकामांवर केवळ ४ कोटी रुपये खर्च पडले आहेत. त्यामुळे विकासाबाबत जिल्हा पिछाडीवर गेला आहे.

पालकमंत्री व सेनेच्या नेत्यांना जनतेशी देणे-घेणे नाही. राज्यकर्त्यांना याचे काहीच वाटत नाही. ४ कोटींचा खर्च पाहता राज्यात सर्वाधिक कमी खर्च करणारा रत्नागिरी हाच जिल्हा असावा. सेनेने लोकांना गृहीत धरू नये, असा इशाराही राणे यांनी दिला.रत्नागिरीत दोन वर्षात गटाराचेही काम नाहीरत्नागिरी शहरात गेल्या दोन वर्र्षात साधे गटाराचेही काम झालेले नाही. त्यामुळेच नगराध्यक्षांनी दोन वर्षांनी राजीनामा दिला तर पुन्हा सेनेचा दुसरा उमेदवार निवडून येण्याची खात्री शिवसेनेला नाही. त्यामुळेच नगराध्यक्षांचा राजीनामा घेण्यास शिवसेना नेते टाळाटाळ करीत आहेत. भैरीबोवा आणि लोकांनाही यांनी गृहीत धरल्याची टीका राणे यांनी केली.रामदास कदम यांनाही लगावला टोलाइको सेन्सिटिव्हमधून ९२ गावे वगळणार, असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केले आहे. त्यांनी आधी आपले अधिकार माहिती करून घ्यावेत. गावे वगळण्याचे अधिकार राज्याला नाहीत, तर ते केंद्राचे अधिकार आहेत. राज्याने त्याबाबत केवळ अहवाल द्यायचा असतो, असेही नीलेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ratnagiriरत्नागिरी