शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

रत्नागिरी :  नियोजनमधील १८३ कोटींपैकी ४ कोटीच खर्च : नीलेश राणे यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:05 IST

रत्नागिरी जिल्ह्याचा विकासच खुंटला आहे, विकासाचे वाटोळे झाले आहे. मात्र, पालकमंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांना याचे कोणतेही देणेघेणे नाही. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असा घणाघाती टोला स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

ठळक मुद्दे नियोजनमधील १८३ कोटींपैकी ४ कोटीच खर्च : नीलेश राणे यांचा घणाघात जिल्हा विकासाचे वाटोळे केल्याचा पालकमंत्र्यांवर आरोप

रत्नागिरी : जिल्हा नियोजन मंडळाच्या चार बैठका होऊनही त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १८३ कोटींचा निधी उपलब्ध असून, विविध खात्यांवर २८ कोटी ५० लाख जमा झाले आहेत. त्यामधील ४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. १७९ कोटी निधी तसाच पडून आहे.

जिल्ह्याचा विकासच खुंटला आहे, विकासाचे वाटोळे झाले आहे. मात्र, पालकमंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांना याचे कोणतेही देणेघेणे नाही. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असा घणाघाती टोला स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.२०१७-१८ या आर्थिक वर्षातही अशीच स्थिती होती. त्यावेळीही जिल्हा नियोजन मंडळाचे ९९ कोटी अखर्चित राहिले होते. ते पुढील वर्षासाठी वर्ग करण्यात आले होते. यावर्षी त्यापेक्षा भयावह स्थिती आहे. १८३ कोटी निधीची तरतूद असतानाही डिसेंबर २०१८च्या या दिवसापर्यंत विकासकामांवर केवळ ४ कोटी रुपये खर्च पडले आहेत. त्यामुळे विकासाबाबत जिल्हा पिछाडीवर गेला आहे.

पालकमंत्री व सेनेच्या नेत्यांना जनतेशी देणे-घेणे नाही. राज्यकर्त्यांना याचे काहीच वाटत नाही. ४ कोटींचा खर्च पाहता राज्यात सर्वाधिक कमी खर्च करणारा रत्नागिरी हाच जिल्हा असावा. सेनेने लोकांना गृहीत धरू नये, असा इशाराही राणे यांनी दिला.रत्नागिरीत दोन वर्षात गटाराचेही काम नाहीरत्नागिरी शहरात गेल्या दोन वर्र्षात साधे गटाराचेही काम झालेले नाही. त्यामुळेच नगराध्यक्षांनी दोन वर्षांनी राजीनामा दिला तर पुन्हा सेनेचा दुसरा उमेदवार निवडून येण्याची खात्री शिवसेनेला नाही. त्यामुळेच नगराध्यक्षांचा राजीनामा घेण्यास शिवसेना नेते टाळाटाळ करीत आहेत. भैरीबोवा आणि लोकांनाही यांनी गृहीत धरल्याची टीका राणे यांनी केली.रामदास कदम यांनाही लगावला टोलाइको सेन्सिटिव्हमधून ९२ गावे वगळणार, असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केले आहे. त्यांनी आधी आपले अधिकार माहिती करून घ्यावेत. गावे वगळण्याचे अधिकार राज्याला नाहीत, तर ते केंद्राचे अधिकार आहेत. राज्याने त्याबाबत केवळ अहवाल द्यायचा असतो, असेही नीलेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ratnagiriरत्नागिरी