शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:14 IST

युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड युती व्हावी, ही सर्वांचीच इच्छा, रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपला ४ जागा हव्या

रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. लवकरच तशी घोषणा होणे अपेक्षित आहे. युती झाली तर शिवसेनेचे उमेदवार सध्याच्या मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल. मात्र, युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.रत्नागिरी दौऱ्यात विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ होत नाही, तोवर रत्नागिरीचे केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा निर्णय झाला आहे. स्वतंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर गेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे ते म्हणाले.राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. त्यासाठी केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तसेच रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी आपण इच्छुक आहोत. जर युती झाली तर या दोन्ही ठिकाणी जो कोणी उमेदवार असेल तर त्याला आधीच्या मतांपेक्षा अधिक मतांनी निवडून आणेन आणि जर युती झाली नाही तर खासदार राऊत किंवा आमदार सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असे ते म्हणाले.युती झाली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी चार जागांची मागणी भाजपकडून केली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपच्या संपर्कात आहेत आणि लवकरच बदल दिसेल, असेही ते म्हणाले.उमेदवारीची घोषणा राज्यस्तरावरूनच होते!जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत:सह जिल्ह्यातील अन्य भाजप उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ती अंतिम नावे आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना आमदार लाड म्हणाले की, भाजपमध्ये काही शिस्त आहे. इच्छुक म्हणून कोणीही आपले नाव जाहीर करू शकतो. पण अंतिम उमेदवारांची नावे राज्यस्तरावरील कोअर कमिटीकडूनच जाहीर होतात. त्यासाठी काही प्रक्रिया असतात. समिती गठीत होते. त्यानंतरच नावे निश्चित होतात.

अजून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत अशी कोणतीही नावे अंतिम झालेली नाहीत अथवा जाहीर झालेली नाहीत. माने यांच्याशी आपला संपर्क झाला नसल्याने त्यांच्या वक्तव्याची आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी