शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:14 IST

युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड युती व्हावी, ही सर्वांचीच इच्छा, रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपला ४ जागा हव्या

रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. लवकरच तशी घोषणा होणे अपेक्षित आहे. युती झाली तर शिवसेनेचे उमेदवार सध्याच्या मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल. मात्र, युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.रत्नागिरी दौऱ्यात विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ होत नाही, तोवर रत्नागिरीचे केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा निर्णय झाला आहे. स्वतंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर गेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे ते म्हणाले.राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. त्यासाठी केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तसेच रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी आपण इच्छुक आहोत. जर युती झाली तर या दोन्ही ठिकाणी जो कोणी उमेदवार असेल तर त्याला आधीच्या मतांपेक्षा अधिक मतांनी निवडून आणेन आणि जर युती झाली नाही तर खासदार राऊत किंवा आमदार सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असे ते म्हणाले.युती झाली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी चार जागांची मागणी भाजपकडून केली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपच्या संपर्कात आहेत आणि लवकरच बदल दिसेल, असेही ते म्हणाले.उमेदवारीची घोषणा राज्यस्तरावरूनच होते!जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत:सह जिल्ह्यातील अन्य भाजप उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ती अंतिम नावे आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना आमदार लाड म्हणाले की, भाजपमध्ये काही शिस्त आहे. इच्छुक म्हणून कोणीही आपले नाव जाहीर करू शकतो. पण अंतिम उमेदवारांची नावे राज्यस्तरावरील कोअर कमिटीकडूनच जाहीर होतात. त्यासाठी काही प्रक्रिया असतात. समिती गठीत होते. त्यानंतरच नावे निश्चित होतात.

अजून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत अशी कोणतीही नावे अंतिम झालेली नाहीत अथवा जाहीर झालेली नाहीत. माने यांच्याशी आपला संपर्क झाला नसल्याने त्यांच्या वक्तव्याची आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी