शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

रत्नागिरी : प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 16:14 IST

युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात लढेन : प्रसाद लाड युती व्हावी, ही सर्वांचीच इच्छा, रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपला ४ जागा हव्या

रत्नागिरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. लवकरच तशी घोषणा होणे अपेक्षित आहे. युती झाली तर शिवसेनेचे उमेदवार सध्याच्या मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल. मात्र, युती नाही झाली तर प्रसंगी उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी विधानसभा निवडणूकही आपण लढवू, असे भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.रत्नागिरी दौऱ्यात विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ होत नाही, तोवर रत्नागिरीचे केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा निर्णय झाला आहे. स्वतंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर गेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे ते म्हणाले.राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. त्यासाठी केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तसेच रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी आपण इच्छुक आहोत. जर युती झाली तर या दोन्ही ठिकाणी जो कोणी उमेदवार असेल तर त्याला आधीच्या मतांपेक्षा अधिक मतांनी निवडून आणेन आणि जर युती झाली नाही तर खासदार राऊत किंवा आमदार सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असे ते म्हणाले.युती झाली तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठपैकी चार जागांची मागणी भाजपकडून केली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपच्या संपर्कात आहेत आणि लवकरच बदल दिसेल, असेही ते म्हणाले.उमेदवारीची घोषणा राज्यस्तरावरूनच होते!जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत:सह जिल्ह्यातील अन्य भाजप उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ती अंतिम नावे आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना आमदार लाड म्हणाले की, भाजपमध्ये काही शिस्त आहे. इच्छुक म्हणून कोणीही आपले नाव जाहीर करू शकतो. पण अंतिम उमेदवारांची नावे राज्यस्तरावरील कोअर कमिटीकडूनच जाहीर होतात. त्यासाठी काही प्रक्रिया असतात. समिती गठीत होते. त्यानंतरच नावे निश्चित होतात.

अजून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत अशी कोणतीही नावे अंतिम झालेली नाहीत अथवा जाहीर झालेली नाहीत. माने यांच्याशी आपला संपर्क झाला नसल्याने त्यांच्या वक्तव्याची आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी