शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरी : आता नगर परिषदांचे प्रभागही होणार स्वच्छ, राज्य शासनातर्फे आयोजन, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:18 IST

राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी असा राहणार आहे, अशी माहिती रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांनी दिली.

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानरत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा सहभागी नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

शोभना कांबळेरत्नागिरी : राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी असा राहणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांनी दिली.सध्या महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत डिसेंबरअखेर स्वच्छ शहर हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला आहे. स्वच्छतेबाबत राज्यातील सर्व शहरांमध्ये सातत्य राहावे, या दृष्टीने राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गातील महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषदांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा मानला जाणार आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे तसेच शहरांची कायमस्वरूपी क्षमता वाढविणे आणि स्वच्छ महाराष्ट्रमध्ये नागरिकांचा सांघिक सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने जागृती करणे, या उद्देशाने आता स्पर्धा आयोजित केली आहे.

स्वच्छ वॉर्ड स्पर्धेत सहभागी होणे सर्व नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींना बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अ, ब आणि क वर्गातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.

रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा आणि दापोली, लांजा, गुहागर, देवरूख आणि मंडणगड या पाच नगरपंचायती या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या नगरपरिषद अथवा नगरपंचायतींच्या अखत्यारीतील प्रत्येक शहरासाठी ही स्पर्धा बंधनकारक आहे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्ड या स्पर्धेत सहभागी होणार आहे.या कालावधीत अ, ब आणि क अशा तीनही वर्गांतील नगरपरिषदांची पाहणी मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. पाहणी करण्यासाठी प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या स्तरावर त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करून वॉर्डची तपासणी करून घ्यावी. हा अहवाल २५ मार्चपर्यंत राज्य शासनाकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.महानगरपालिका स्तरावर अ,ब, क आणि ड अशा वर्गांसाठी बक्षिसे दिली जाणार आहेत. अ व ब गटासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ५० लाख, ३५ लाख आणि २० लाख तर क व ड गटासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ३० लाख, २० लाख आणि १५ लाख अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

नगरपरिषद स्तरावर अ, ब आणि क अशा तीन वर्गांसाठी देण्यात येणारी बक्षिसे : अ वर्गासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ३० लाख, २० लाख आणि १५ लाख. ब वर्गासाठी २० लाख, १५ लाख आणि १० लाख, क वर्गासाठी १५ लाख, १५ लाख आणि ५ लाख रूपये अशी देण्यात येणार आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRatnagiriरत्नागिरी