शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई, प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांना केला दंड

By मेहरून नाकाडे | Updated: October 18, 2022 18:50 IST

नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कापडी, कागदी पिशवीचा वापर करण्याचे केले आवाहन

रत्नागिरी : दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेकडून प्लास्टिक बंदी संदर्भात कडक कारवाई सुरू असून शहरातून सात किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांकडून ३० हजार रुपयाच्या दंड वसूल करण्यात आला.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र शासन प्लास्टिक बंदी अधिनियम २०१६ नुसार रत्नागिरी शहरात प्लास्टिक बंदी संदर्भात कडक कारवाई करण्यात येत आहे. नगरपरिषदेतर्फे स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांच्या वतीने उपविभागिय अधिकारी राहुल मोटे तसेच अमित लाट्ये यांनी शहरातील १५ पेक्षा जास्त आस्थापनांची पाहणी केली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली. शहरातील राम आळी ते गोखले नाका या व्यापारी भागातून ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच विविध आस्थापनांच्या माध्यमातून ३० हजार रुपयेचा दंडही आकारण्यात आला.यापुढे शहरात सिंगल युज प्लास्टिक वापरताना आढळून आल्यास त्या आस्थापनांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सक्त सूचना करण्यात आली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कापडी, कागदी पिशवीचा वापर करून शहराला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्लास्टिक मुक्त करु या, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPlastic banप्लॅस्टिक बंदी