शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीची तयारी ! - अनेकजण स्पर्धेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:29 IST

लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी

ठळक मुद्दे- लोकसभा निकालानंतर राहुल पंडित देणार राजीनामा ?

प्रकाश वराडकर । रत्नागिरी : लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपद स्वीकारले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा असून, थेट निवडणूकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सेनेचे राहुल पंडित यांना पक्षाने दोन वर्षांसाठी दिल्याची व त्यानंतरच्या कालावधीत बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली जाणार अशी कुजबूज गेल्या दोन वर्षांपासून होती. मात्र, त्याबाबत सेनेच्या नेत्यांनी मौन पाळले होते. पंंडित यांची दोन वर्षे पूर्ण होताच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचदरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने पंडित यांनी रजेवर जाण्याचा मार्ग पक्षाने काढला. रजा संपून आता पंडित यांनी पदभार स्वीकारला. मात्र, ते प्रत्यक्ष काम करीत नसल्याने नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षातूनच सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ आहे. या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांचे नाव सेनेतर्फे पुढे येत आहे. शिवसेनेतून त्यांच्या नावाची चर्चा असल्याने सध्या शहरात या थेट निवडणुकीसाठी सेनेतर्फेही तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहणारे बंड्या साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तालुक्यात आपल्या संघटन कौशल्याने शिवसेनेची चांगली बांधणी केली आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी धडाडीने निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सेनेतर्फे साळवी यांनाच थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्मितल पावसकर यांचीही नावे चर्चेत आहेत.थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार याची कल्पना राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांना होती. त्यामुळे उमेश शेट्ये निवडणूक लढविणार होते. मात्र, त्यांचे अकाली निधन  झाले. त्यामुळे आता शेट्ये यांची सून नगरसेविका कौसल्या शेट्ये  तसेच  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची नावे चर्चेत आहेत. रत्नागिरीच्या थेट नगराध्यपद निवडणुकीबाबतचा निर्णय लोकसभा निवडणूक निकालावर अवलंबून राहणार आहे. कुवारबाव पॅटर्न वापरणार!रत्नागिरीत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक  होणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच त्यावेळी सेना-भाजपची युती असेल का, हा मुद्दाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी शिवसेना विरूद्ध इतर सर्व पक्ष असा फॉर्म्युला कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आला. तेथे सेनेचा पराभव झाला. तसाच फॉर्म्युला रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राबविला जाईल का, याचीही चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाली आहे.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक