शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीची तयारी ! - अनेकजण स्पर्धेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:29 IST

लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी

ठळक मुद्दे- लोकसभा निकालानंतर राहुल पंडित देणार राजीनामा ?

प्रकाश वराडकर । रत्नागिरी : लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपद स्वीकारले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा असून, थेट निवडणूकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सेनेचे राहुल पंडित यांना पक्षाने दोन वर्षांसाठी दिल्याची व त्यानंतरच्या कालावधीत बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली जाणार अशी कुजबूज गेल्या दोन वर्षांपासून होती. मात्र, त्याबाबत सेनेच्या नेत्यांनी मौन पाळले होते. पंंडित यांची दोन वर्षे पूर्ण होताच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचदरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने पंडित यांनी रजेवर जाण्याचा मार्ग पक्षाने काढला. रजा संपून आता पंडित यांनी पदभार स्वीकारला. मात्र, ते प्रत्यक्ष काम करीत नसल्याने नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षातूनच सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ आहे. या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांचे नाव सेनेतर्फे पुढे येत आहे. शिवसेनेतून त्यांच्या नावाची चर्चा असल्याने सध्या शहरात या थेट निवडणुकीसाठी सेनेतर्फेही तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहणारे बंड्या साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तालुक्यात आपल्या संघटन कौशल्याने शिवसेनेची चांगली बांधणी केली आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी धडाडीने निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सेनेतर्फे साळवी यांनाच थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्मितल पावसकर यांचीही नावे चर्चेत आहेत.थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार याची कल्पना राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांना होती. त्यामुळे उमेश शेट्ये निवडणूक लढविणार होते. मात्र, त्यांचे अकाली निधन  झाले. त्यामुळे आता शेट्ये यांची सून नगरसेविका कौसल्या शेट्ये  तसेच  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची नावे चर्चेत आहेत. रत्नागिरीच्या थेट नगराध्यपद निवडणुकीबाबतचा निर्णय लोकसभा निवडणूक निकालावर अवलंबून राहणार आहे. कुवारबाव पॅटर्न वापरणार!रत्नागिरीत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक  होणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच त्यावेळी सेना-भाजपची युती असेल का, हा मुद्दाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी शिवसेना विरूद्ध इतर सर्व पक्ष असा फॉर्म्युला कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आला. तेथे सेनेचा पराभव झाला. तसाच फॉर्म्युला रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राबविला जाईल का, याचीही चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाली आहे.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक