शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीची तयारी ! - अनेकजण स्पर्धेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:29 IST

लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी

ठळक मुद्दे- लोकसभा निकालानंतर राहुल पंडित देणार राजीनामा ?

प्रकाश वराडकर । रत्नागिरी : लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपद स्वीकारले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा असून, थेट निवडणूकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सेनेचे राहुल पंडित यांना पक्षाने दोन वर्षांसाठी दिल्याची व त्यानंतरच्या कालावधीत बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली जाणार अशी कुजबूज गेल्या दोन वर्षांपासून होती. मात्र, त्याबाबत सेनेच्या नेत्यांनी मौन पाळले होते. पंंडित यांची दोन वर्षे पूर्ण होताच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचदरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने पंडित यांनी रजेवर जाण्याचा मार्ग पक्षाने काढला. रजा संपून आता पंडित यांनी पदभार स्वीकारला. मात्र, ते प्रत्यक्ष काम करीत नसल्याने नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षातूनच सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ आहे. या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांचे नाव सेनेतर्फे पुढे येत आहे. शिवसेनेतून त्यांच्या नावाची चर्चा असल्याने सध्या शहरात या थेट निवडणुकीसाठी सेनेतर्फेही तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहणारे बंड्या साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तालुक्यात आपल्या संघटन कौशल्याने शिवसेनेची चांगली बांधणी केली आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी धडाडीने निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सेनेतर्फे साळवी यांनाच थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्मितल पावसकर यांचीही नावे चर्चेत आहेत.थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार याची कल्पना राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांना होती. त्यामुळे उमेश शेट्ये निवडणूक लढविणार होते. मात्र, त्यांचे अकाली निधन  झाले. त्यामुळे आता शेट्ये यांची सून नगरसेविका कौसल्या शेट्ये  तसेच  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची नावे चर्चेत आहेत. रत्नागिरीच्या थेट नगराध्यपद निवडणुकीबाबतचा निर्णय लोकसभा निवडणूक निकालावर अवलंबून राहणार आहे. कुवारबाव पॅटर्न वापरणार!रत्नागिरीत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक  होणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच त्यावेळी सेना-भाजपची युती असेल का, हा मुद्दाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी शिवसेना विरूद्ध इतर सर्व पक्ष असा फॉर्म्युला कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आला. तेथे सेनेचा पराभव झाला. तसाच फॉर्म्युला रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राबविला जाईल का, याचीही चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाली आहे.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक