शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक :सेनेविरोधात बाकी पक्ष एकच उमेदवार देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:44 IST

राहुल पंडित यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आतापासूनच गहिरे रंग भरू लागले आहेत. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित आहे.

ठळक मुद्देसेनेविरोधात बाकी पक्ष एकच उमेदवार देणार?रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत कुवारबाव पॅटर्नची जोरात चर्चा

रत्नागिरी : राहुल पंडित यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आतापासूनच गहिरे रंग भरू लागले आहेत. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित आहे.

आता थेट निवडणुकीत सेनेला शह देण्यासाठी कुवारबाव ग्रामपंचायतीत सेना विरोधात सर्व पक्षीय आघाडीचा यशस्वी झालेला फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरला जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेला आघाडीशी कडवी झुंज द्यावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रत्नागिरीचे सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी गेल्याच आठवड्यात नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रत्नागिरीचे नगराध्यक्षपद रिक्त झाले आहे. पंडित हे राजीनामा देणार व सेनेचे तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष बंड्या साळवी हे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यानुसार पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्ष निवडणुकीबाबत रत्नागिरीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे बंड्या साळवी हेच उमेदवार असतील. त्यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली जाईल, असे म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.दोन वर्षांपूर्वीही थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या बंड्या साळवी यांना दोन वर्षांनंतर संधी देण्याचा शब्द लेखी पत्रातून देण्यात आला होता.

त्यानुसार लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी शहरात शिवसेनेला मताधिक्य असल्याने स्थिती चांगली आहे, हे जाणूनच पक्षाने पंडित यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला, अन त्यांनी राजीनामा दिला. मात्र, पंडित यांना पाच वर्षांसाठी जनतेने निवडून दिलेले असताना त्यांचा राजीनामा का घेतला, असा सवालही काही घटकांकडून केला जात आहे.दरम्यान, या विषयावरून शहरात रणकंदन माजले असून, सेनेला थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजायचेच, असा निश्चय काही घटकांनी केला आहे. त्यासाठी शहरातील दोन मोठे गट (घटक) एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आघाडीचे किंवा सर्व विरोधकांचे पुरस्कृत असे उमेदवार निश्चित करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्यामध्ये सेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव चर्चेत आहे.

शहरातील एक मोठा गट (समूह) सेनेच्या विरोधात सक्रीय झाला असून, आपल्या गटाचा स्वतंत्र उमेदवारही उभा करण्याची तयारी सुरू झाली आहे. पंडित यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप निवडणूक विभागाने थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम, तारीख जाहीर करणे बाकी आहे. 

रंगतदार लढतनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बंड्या साळवी हे उमेदवार असतील काय, ते उमेदवार असतील तर त्यांच्याविरोधात कोण-कोण उमेदवार असतील, निवडणुकीचे डावपेच काय असतील, माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा राष्ट्रवादीला होईल काय, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक सोपी नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी