शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रत्नागिरी नगर परिषद तयार करणार घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:04 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri- रत्नागिरी शहराचे विस्तारीकरण व भविष्याचा विचार करून नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा तयार करण्यात येणार आहे. मात्र, एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने नगर परिषदेने फेरआराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदांडेआडोम येथे उभारणार घनकचरा प्रकल्प,नगर परिषदेचा निर्णयअनेक वर्ष कचऱ्याचा प्रश्न खितपत, न्यायालयाने दिला नगर परिषदेच्या बाजूने निर्णय

रत्नागिरी : शहराचे विस्तारीकरण व भविष्याचा विचार करून नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा तयार करण्यात येणार आहे. मात्र, एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने नगर परिषदेने फेरआराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे.दांडेआडोम येथे १५ कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता. अडीच हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारून कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया होणार आहे. त्यावर बायोगॅस प्रकल्प, वीज प्रकल्प, खत प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा यापूर्वी परिषदेने केला आहे. त्याचा डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा एक कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी सर्वकाही करण्याचा नगर परिषदेचा विचार आहे. शहरापासून काही किलोमीटर लांब असल्याने त्याचा विचार करून फेरआराखडा तयार केला जाणार आहे.घनकचरा प्रकल्पासाठी दांडेआडोम येथील जागा निश्चित केली. मात्र, त्याला दांडेआडोम येथील ग्रामस्थांनी विरोध केला असून, ते नगर परिषदेच्या विरोधात न्यायालयात गेले.

अनेक वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात सुमारे २२ टन कचरा दररोज संकलित करून या कचऱ्यावर प्रस्तावित घनकचरा प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे.प्रदूषण होणार नसल्याचा दावाशहरातील संकलित केलेल्या कचऱ्यावर थेट प्रक्रिया केली जाणार आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करून ते सिमेंट कंपनीला दिले जाणार आहे. वैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा प्रश्नच निर्माण होणार नसल्याचा दावा नगर परिषदेने केला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद