शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

रत्नागिरी नगर परिषद तयार करणार घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:04 IST

Garbage Disposal Issue Ratnagiri- रत्नागिरी शहराचे विस्तारीकरण व भविष्याचा विचार करून नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा तयार करण्यात येणार आहे. मात्र, एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने नगर परिषदेने फेरआराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदांडेआडोम येथे उभारणार घनकचरा प्रकल्प,नगर परिषदेचा निर्णयअनेक वर्ष कचऱ्याचा प्रश्न खितपत, न्यायालयाने दिला नगर परिषदेच्या बाजूने निर्णय

रत्नागिरी : शहराचे विस्तारीकरण व भविष्याचा विचार करून नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेरआराखडा तयार करण्यात येणार आहे. मात्र, एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने नगर परिषदेने फेरआराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे.दांडेआडोम येथे १५ कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता. अडीच हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारून कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया होणार आहे. त्यावर बायोगॅस प्रकल्प, वीज प्रकल्प, खत प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा यापूर्वी परिषदेने केला आहे. त्याचा डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा एक कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी सर्वकाही करण्याचा नगर परिषदेचा विचार आहे. शहरापासून काही किलोमीटर लांब असल्याने त्याचा विचार करून फेरआराखडा तयार केला जाणार आहे.घनकचरा प्रकल्पासाठी दांडेआडोम येथील जागा निश्चित केली. मात्र, त्याला दांडेआडोम येथील ग्रामस्थांनी विरोध केला असून, ते नगर परिषदेच्या विरोधात न्यायालयात गेले.

अनेक वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरात सुमारे २२ टन कचरा दररोज संकलित करून या कचऱ्यावर प्रस्तावित घनकचरा प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे.प्रदूषण होणार नसल्याचा दावाशहरातील संकलित केलेल्या कचऱ्यावर थेट प्रक्रिया केली जाणार आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करून ते सिमेंट कंपनीला दिले जाणार आहे. वैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा प्रश्नच निर्माण होणार नसल्याचा दावा नगर परिषदेने केला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नRatnagiri Nagar Parishadरत्नागिरी नगर परिषद