शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

Ratnagiri: मोरवणे गावाने जपलीय ‘सैनिकी’ परंपरा, आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली सेवा 

By संदीप बांद्रे | Updated: April 5, 2023 13:31 IST

मोरवणे गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील तरुण भारतीय सैन्यदलात रुजू

संदीप बांद्रेचिपळूण : तालुक्यातील मोरवणे गावाला भारतीय सैन्याची मोठी परंपरा राहिली आहे. स्व. भास्करराव शिंदे यांनी बॉईज बटालियनच्या माध्यमातून येथील तरुणांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले आणि एक-एक करत मोरवणे गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील तरुण भारतीय सैन्यदलात रुजू झाले. आजही या गावातील तब्बल ३० जण भारतीय सैन्यदलात देशसेवा करत आहेत, तर आतापर्यंत सुमारे ३०० हून अधिक जणांनी देशसेवा केली आहे. त्यामुळे मोरवणे गावाला सैनिकांचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे.चिपळूण तालुक्यातील दसपटी विभाग हा भारतीय सैन्यासाठी ओळखला जातो. मोरवणे गावाने भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. १९४९ साली येथील भास्करराव शिंदे हे सर्वप्रथम सैन्यदलात रुजू झाले. शिपाईपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. सैन्यात काम करण्यास व देशसेवा बजावण्यात मोठा वाव आहे.आपला कोकणी माणूस कष्टाळू आहे. तो हे सहज करू शकतो हे भास्करराव शिंदे यांनी त्यावेळी हेरले आणि गावातील तरुणांना देशसेवेचे धडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. पुढे ‘बॉईज बटालियन’च्या माध्यमातून त्यांनी येथील १७ वर्षीय तरुणांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले आणि इंडियन आर्मीत एक-एक तरुणाला जागा मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. दुसऱ्या बाजूला स्वतः त्यांनी भारतीय सैन्यदलात यशाची एक-एक पायरी पादाक्रांत केली.इंडियन प्यारामध्ये मोरवणेचे भास्करराव शिंदे सर्वोत्तम जम्पर ठरले होते. सुमारे ३५ वर्षे त्यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. तोपर्यंत मोरवणे गावातील अनेक तरुण सैन्यदलात रुजू झाले होते, तर मोरवणे गावातील सुमारे ३०० हून अधिक जण भारतीय सैन्यात दाखल झाले. आजच्या घडीला तब्बल ३० हून अधिक जण भारतीय सैन्यात महत्त्वाच्या विविध पदांवर देशसेवा बजावत आहेत. त्यापैकी सुभेदार अजय ढगळे हे देशसेवा करताना शहीद झाले.

आतापर्यंत मोरवणे गावातील ३०० हून अधिक जणांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यातील प्रत्येकाने युद्धाचा सामना केला आहे. मात्र, युद्धात जखमी होऊन नंतर कालांतराने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत; पण गावातील एकाही सैनिकाचा युद्धात मृत्यू झालेला नाही. ग्रामदेवतेचा हा प्रसाद असून, त्या विश्वासावर गावचा प्रत्येक सैनिक देशसेवेचे काम करीत असतो.  - शरद शिंदे, माजी सैनिक, मोरवणे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndian Armyभारतीय जवान