शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पाच वर्षानंतर कमी पाऊस

By admin | Updated: October 6, 2014 22:33 IST

दहा वर्षात दुसऱ्यांदा पावसाने रडवले

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षात यावर्षी दुसऱ्यांदा शासकीय प्रमाणकापेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. २००९ साली यंदापेक्षाही पाऊस कमी झाला होता. पुन्हा पाच वर्षांनंतर कमी पाऊस झाला आहे.शासकीय प्रमाणकानुसार रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ३३६४ मिलिमीटर इतका पाऊस होतो. मात्र, २००९ साली या चार महिन्यात झालेला पाऊस सरासरी २८६७ मिलिमीटर इतका नोंदला गेला आहे. म्हणजे या प्रमाणकापेक्षा ५२७ मिलिमीटर इतका कमी झाला होता. तसेच यावर्षीही ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ३०१५ मिलिमीटर म्हणजे ३५० मिलिमीटरने कमी झाला आहे. सन २००९च्या आॅगस्ट महिन्यापर्यंत पडलेला पाऊस सर्वात कमी (२२८२ मिलिमीटर) तसेच यावर्षीही आॅगस्ट २०१४ पर्यंत पडलेला पाऊस (२४९६.५४) मिलिमीटर असून, २००९ सालापेक्षा थोडासा जास्त असला तरी या दहा वर्षात दुसऱ्यांदा पर्जन्यमान कमी झालेले आहे.या दहा वर्षाच्या कालावधीत २०११ साली सर्वाधिक पाऊस (सरासरी ४६८० मिलिमीटर) झाला होता. म्हणजेच शासकीय प्रमाणकापेक्षा १३१६ मिलिमीटरने अधिक झाला होता. २००७, २०१० आणि २०१३ सालीही पर्जन्यमान शासकीय प्रमाणकापेक्षा ७०० मिलिमीटरपेक्षा अधिक सरासरीने पडला होता. रत्नागिरी जिल्ह्यात दशकभरात यंदा कमी पाऊस पडला. पाच वषार्नंतर ही वेळ आल्याने आॅक्टोबरमध्येच पुढील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दशकभरात २०११ साली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने त्यावेळी ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. आॅक्टोबरमध्येही पाऊस पडत राहिला असला तरी शासकीय प्रमाणकानुसार यंदा पाऊस कमी पडला. या कमी पावसाचा परिणाम गंभीर होऊ शकेल. (प्रतिनिधी)दशकभराचे पर्जन्यमानसनआॅगस्टसप्टेंबर२००४२९६१३२७८२००५३२४०३९१३२००६३१८८३७९५२००७३३८२४१६५२००८२६२५३३५५२००९२२८२२८३७२०१०३४५६४१३०२०११४१३५४६८०२०१२३०२५३५८६२०१३३७५०४११६२०१४२४९७३११६शासकीय प्रमाणकापेक्षा कमी पाऊस.चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर पाऊस.२०११ साली पडला होता सर्वाधिक पाऊस. यंदाच्या कमी पावसामुळे पाणी टंचाईची भीती.