शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रत्नागिरी : पालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवर, जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:43 IST

गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवररत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता

रत्नागिरी : गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.यावर्षी ३३७३ सेंटीमीटर इतका पाऊस झाला आहे.पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले आहे. मात्र सप्टेंबरपासूनच पाऊस गायब असून पावसाळ्यात तीव्र ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. आॅक्टोबरमध्ये अधूनमधून पडलेला पाऊस यामुळे आंबा कलमांना पालवी मोठ्या प्रमाणात आली आहे. हंगामापूर्वी उत्पन्न मिळविण्यासाठी कल्टार सारखी संजीवके वापरली जातात. कल्टार वापरूनसुध्दा झाडांना पालवीच आली आहे.साधारणत: ज्यावेळी कलमांची जूनी पाने पानगळ होते, त्याचवेळी नवीन पालवी येण्यास प्रारंभ होतो. वास्तविक सप्टेंबर मध्ये पालवी येणे अपेक्षित होते. परंतु आॅक्टोंबरमध्येच पालवीचे प्रमाण वाढले आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी पालवी जून होणे गरजेचे आहे. त्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. जर थंडी चांगली असेल तर मात्र मोहोर लवकर येण्याची शक्यता आहे. परंतु आॅक्टोबर निम्मा झाला तरी थंडी गायब आहे. धुके मात्र पडू लागले आहे.

शेतकरी थंडी वाढावी अशी अपेक्षा करीत आहेत. आॅक्टोबरमध्ये जर मोहोर आला तर फळधारणा होवून आंबा मार्चमध्ये बाजारात दाखल होतो. समुद्र किनारपट्टी लगतच्या मोजक्याच झाडांना मोहोर आला आहे. मोहोराचे प्रमाण तर अवघे दोन टक्के आहे. थंडी वाढली तरी पालवी जून होवून मोहोर डिसेंबर उजाडणार आहे.

डिसेंबरमध्ये आलेल्या मोहोराचा आंबा तयार होवून बाजारात येण्यासाठी एप्रिल उजाडणार आहे. एकूणच सध्या तरी पालवी जून होण्यासाठीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. आंबा एकाचवेळी तयार होवून बाजारात आला तर तर घसरण्याची भिती आहे. पालवीमुळे यावर्षीसुध्दा आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. एकूणच जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमी झालेला पाऊस व अधिकत्तम उष्णता यामुळे झाडांना पालवी येण्याचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यासाठी नैसर्गिकत: अडीच ते तीन महिने लागतात. आॅक्टोबर निम्मा झाला असून सर्वत्र पालवीच पालवी आहे. एकूण ९८ टक्के पालवीचे प्रमाण आहे. दरवर्षी मार्चमध्ये आंबा बाजारात विक्रीस येतो परंतु यावर्षी आंबा बाजारात येण्यास एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे. दरवर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादनामध्ये घट होत असून शेतकऱ्यांना त्याची आर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. यावर्षीसुध्दा पिक लांबण्याची शक्यता आहे.एम.एस.गुरव, शेतकरी.

शेतकऱ्यांकडून आंब्याला लवकर मोहोर व फळे येण्यासाठी वापरली जाणारी विविध कंपनीची पिक संवर्धन संजिवके वापरण्यात येतात. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ४० हजार लिटर कृषी संजीवकांची विक्री होते. विविध कंपन्याची पिक संवर्धन संजिवके वापरली जातात.

कृषी संजीवकांच्या किमंती भरमसाठ असल्या तरी शेतकरी ती संजीवके वापरतात. यावर्षी संजीवके वापरलेल्या झाडांबरोबर न वापरलेल्या झाडांनासुध्दा मोहोर आला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे संजीवकांसाठी केलेला खर्च शेतकऱ्यांचा वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी