शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:23 IST

राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.

ठळक मुद्देसेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावरग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरूराजापुरातील महावितरणचे कार्यालय स्थलांतरीत केल्याने गैरसोय

राजापूर : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.यापूर्वी महावितरण कंपनीच्या आदेशानुसार तालुक्यातील खासगी जागेत भाड्याने कार्यरत असलेली महावितरणची कार्यालये स्वमालकीच्या जागेत हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी असलेली भाग एक व दोन अशी कार्यालये शहरापासून दोन किमी अंतरावरील दूर अशा महावितरण कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आली होती.महावितरण विभागाच्या या निर्णयाने राजापूर शहरातील ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू लागला होता. महावितरणशी संबंधीत येत असलेल्या अडीअडचणींबाबत दोन किमी दूर अंतरावर जाताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले होते. ही स्थलांतरीत केलेली कार्यालये मूळ जागेत पुन्हा यावीत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते.त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्यासह विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करुन ग्राहकांची कशी अडचण येत आहे, ते त्यांच्या लक्षात आणून दिले होते. पण, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

त्यामुळे संतापलेल्या वीज ग्राहकांनी व सर्व पक्षीयांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात आली होती. तत्पूर्वी आमदार राजन साळवी यांनीदेखील संबंधीत महावितरण कंपनीला चांगलाच दणका दिला होता.त्यामुळे महावितरण प्रशासन हादरले. नमते घेताना शहरवासीयांची व तालुक्यातील जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्याला सकारात्मक प्रतिसाद सभापती सुभाष गुरव यांनी देताना पंचायत समितीच्या आवारातील वापरात नसलेल्या गोडाऊनची इमारत तत्काळ देण्याचा निर्णय घेतला व ती स्वच्छ करून जनतेच्या सेवेसाठी विनामोबदला दिली. त्यानंतर महावितरण केंद्राचे ग्राहक तक्रार निवारण केंद्र त्याठिकाणी आणले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण