शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
3
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
4
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
5
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
6
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
7
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
8
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
9
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
10
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
11
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
12
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
13
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
14
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
15
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
16
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
17
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
18
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
19
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
20
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:23 IST

राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.

ठळक मुद्देसेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावरग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरूराजापुरातील महावितरणचे कार्यालय स्थलांतरीत केल्याने गैरसोय

राजापूर : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.यापूर्वी महावितरण कंपनीच्या आदेशानुसार तालुक्यातील खासगी जागेत भाड्याने कार्यरत असलेली महावितरणची कार्यालये स्वमालकीच्या जागेत हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी असलेली भाग एक व दोन अशी कार्यालये शहरापासून दोन किमी अंतरावरील दूर अशा महावितरण कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आली होती.महावितरण विभागाच्या या निर्णयाने राजापूर शहरातील ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू लागला होता. महावितरणशी संबंधीत येत असलेल्या अडीअडचणींबाबत दोन किमी दूर अंतरावर जाताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले होते. ही स्थलांतरीत केलेली कार्यालये मूळ जागेत पुन्हा यावीत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते.त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्यासह विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करुन ग्राहकांची कशी अडचण येत आहे, ते त्यांच्या लक्षात आणून दिले होते. पण, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

त्यामुळे संतापलेल्या वीज ग्राहकांनी व सर्व पक्षीयांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात आली होती. तत्पूर्वी आमदार राजन साळवी यांनीदेखील संबंधीत महावितरण कंपनीला चांगलाच दणका दिला होता.त्यामुळे महावितरण प्रशासन हादरले. नमते घेताना शहरवासीयांची व तालुक्यातील जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्याला सकारात्मक प्रतिसाद सभापती सुभाष गुरव यांनी देताना पंचायत समितीच्या आवारातील वापरात नसलेल्या गोडाऊनची इमारत तत्काळ देण्याचा निर्णय घेतला व ती स्वच्छ करून जनतेच्या सेवेसाठी विनामोबदला दिली. त्यानंतर महावितरण केंद्राचे ग्राहक तक्रार निवारण केंद्र त्याठिकाणी आणले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण