शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

रत्नागिरी : सेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:23 IST

राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.

ठळक मुद्देसेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावरग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरूराजापुरातील महावितरणचे कार्यालय स्थलांतरीत केल्याने गैरसोय

राजापूर : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.यापूर्वी महावितरण कंपनीच्या आदेशानुसार तालुक्यातील खासगी जागेत भाड्याने कार्यरत असलेली महावितरणची कार्यालये स्वमालकीच्या जागेत हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी असलेली भाग एक व दोन अशी कार्यालये शहरापासून दोन किमी अंतरावरील दूर अशा महावितरण कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आली होती.महावितरण विभागाच्या या निर्णयाने राजापूर शहरातील ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू लागला होता. महावितरणशी संबंधीत येत असलेल्या अडीअडचणींबाबत दोन किमी दूर अंतरावर जाताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले होते. ही स्थलांतरीत केलेली कार्यालये मूळ जागेत पुन्हा यावीत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते.त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्यासह विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करुन ग्राहकांची कशी अडचण येत आहे, ते त्यांच्या लक्षात आणून दिले होते. पण, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

त्यामुळे संतापलेल्या वीज ग्राहकांनी व सर्व पक्षीयांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात आली होती. तत्पूर्वी आमदार राजन साळवी यांनीदेखील संबंधीत महावितरण कंपनीला चांगलाच दणका दिला होता.त्यामुळे महावितरण प्रशासन हादरले. नमते घेताना शहरवासीयांची व तालुक्यातील जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्याला सकारात्मक प्रतिसाद सभापती सुभाष गुरव यांनी देताना पंचायत समितीच्या आवारातील वापरात नसलेल्या गोडाऊनची इमारत तत्काळ देण्याचा निर्णय घेतला व ती स्वच्छ करून जनतेच्या सेवेसाठी विनामोबदला दिली. त्यानंतर महावितरण केंद्राचे ग्राहक तक्रार निवारण केंद्र त्याठिकाणी आणले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण