शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

दिल्लीवासींना चाखता येणार रत्नागिरी हापूस आंब्याची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 05:32 IST

पुढच्या आठवड्यात होणार १५० पेट्या रवाना

रत्नागिरी : आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असणारा रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव आता दिल्लीवासीयांना चाखता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कंपनीकडून शेतकऱ्यांकडून थेट आंबा खरेदी सुरू आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात १५० पेट्या हापूस आंबा दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.मुंबईच्या बाजारात पसंती मिळाल्यानंतर आता दिल्लीच्या बाजारपेठेत रत्नागिरीचा सेंद्रिय हापूस पाठविण्यात येणार आहे. रासायनिक खते, कीटकनाशके याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील शेतकºयांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला आंबा काढणीयोग्य झाला असून, त्याची तोडणी सुरू झाली आहे.या सेंद्रिय आंब्यासाठी दर निश्चित करण्यात आला असून थेट शेतकºयांकडून आंबा खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकºयांचा वाहतूक खर्च, हमाली, दलालीचा खर्च वाचला आहे. घरबसल्या शेतकºयांना आंबा विक्रीतून चांगला दर मिळत आहे. सेंद्रिय आंब्याला मुंबईतील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आंबा दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. मुलुंडच्या अनघा सावंत यांच्या मदतीने राजधानी एक्स्प्रेसमधून हा आंबा दिल्ली बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. यासाठी १०० किलोमागे ६५० रुपये वाहतूक खर्च व ८० रुपये हमालीसाठी खर्च येणार आहे.पहिल्या टप्प्यात आंब्याच्या १०० पेट्या मुंबईला!रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकºयांच्या कंपनीतर्फे हापूस आंब्याच्या आलेल्या मागणीच्या नोंदणीनुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून शंभर पेट्या मुंबईला पाठविण्यात आल्या होत्या. सेंद्रिय आंब्यासाठी आता दिल्ली येथून मागणी आली आहे.

टॅग्स :Mangoआंबा