शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरी : दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:28 IST

आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

ठळक मुद्दे दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघकोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने महिला प्रदेशाध्यक्ष रत्नागिरीत

रत्नागिरी : आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ कोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने रत्नागिरीत आल्या होत्या़ त्या पुढे म्हणाला, राज्य सरकारने गेली चार वर्षे केवळ आश्वासने दिली़ त्या आश्वासनाचे कुठेही फलीत झालेले आपल्याला पहायला मिळत नाही़ चार वर्षे पूर्ण झाल्याने सरकारकडून राज्यात महागाई वाढली, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यांचे सेलीबे्रशन सुरु आहे. देशात आणि राज्यात फार भीषण परिस्थिती असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.गोरगरिबांच्या तोंडचा गोड घास या सणासुदीच्या दिवसांत पळवून नेण्याचं पाप या सरकारने केलंय़ हेच अच्छे दिन आहेत का, असे विचारण्याची आज वेळ आली आहे़ रेशन दुकांनावर गहू, तांदूळ, साखर नाही़ ज्या ठिकाणी गहू, तांदूळ आहे तेथे तूरीची डाळ जबरदस्तीने गरीबांच्या माथी मारली जात आहे, अशी परिस्थिती आहे़.

या सरकारचं ५० टक्के जनसंख्येवर विश्वास राहिलेला नाही़ कारण आता बायोमेट्रिक पध्दत आणली़ या आधी धान्य सर्वांना मिळायचं़ आता मात्र थमइंप्रेशनशिवाय धान्य मिळत नाही़ बरेच लोक वयोवृध्द आहेत़ ते रेशन दुकानांपर्यंत येवू शकत नाहीत़ अशानाही तेथेपर्यंत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.

विकृतीला शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत़ असे अनेक प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत़ कशा पध्दतीने हे सरकार फसवे आहे़ हे लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे़ तसेच जनतेमध्ये या सरकारकडून फसवणुक झाल्याची भावना निर्माण झाल्याचे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे़ आश्वासने पूर्ण करु शकलेले नाही़ म्हणूनच येणाऱ्या दिवसांमध्ये परिवर्तन निश्चित दिसेल़ आणि या सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे काम ही महाराष्ट्राची जनता करील, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला़,यावेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, अल्पसंख्यांक नेते बशीर मुर्तुझा, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, नगरसेवक मुसा काझी आणि इतर कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघRatnagiriरत्नागिरी