शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

रत्नागिरी : दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:28 IST

आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

ठळक मुद्दे दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघकोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने महिला प्रदेशाध्यक्ष रत्नागिरीत

रत्नागिरी : आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ कोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने रत्नागिरीत आल्या होत्या़ त्या पुढे म्हणाला, राज्य सरकारने गेली चार वर्षे केवळ आश्वासने दिली़ त्या आश्वासनाचे कुठेही फलीत झालेले आपल्याला पहायला मिळत नाही़ चार वर्षे पूर्ण झाल्याने सरकारकडून राज्यात महागाई वाढली, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यांचे सेलीबे्रशन सुरु आहे. देशात आणि राज्यात फार भीषण परिस्थिती असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.गोरगरिबांच्या तोंडचा गोड घास या सणासुदीच्या दिवसांत पळवून नेण्याचं पाप या सरकारने केलंय़ हेच अच्छे दिन आहेत का, असे विचारण्याची आज वेळ आली आहे़ रेशन दुकांनावर गहू, तांदूळ, साखर नाही़ ज्या ठिकाणी गहू, तांदूळ आहे तेथे तूरीची डाळ जबरदस्तीने गरीबांच्या माथी मारली जात आहे, अशी परिस्थिती आहे़.

या सरकारचं ५० टक्के जनसंख्येवर विश्वास राहिलेला नाही़ कारण आता बायोमेट्रिक पध्दत आणली़ या आधी धान्य सर्वांना मिळायचं़ आता मात्र थमइंप्रेशनशिवाय धान्य मिळत नाही़ बरेच लोक वयोवृध्द आहेत़ ते रेशन दुकानांपर्यंत येवू शकत नाहीत़ अशानाही तेथेपर्यंत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.

विकृतीला शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत़ असे अनेक प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत़ कशा पध्दतीने हे सरकार फसवे आहे़ हे लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे़ तसेच जनतेमध्ये या सरकारकडून फसवणुक झाल्याची भावना निर्माण झाल्याचे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे़ आश्वासने पूर्ण करु शकलेले नाही़ म्हणूनच येणाऱ्या दिवसांमध्ये परिवर्तन निश्चित दिसेल़ आणि या सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे काम ही महाराष्ट्राची जनता करील, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला़,यावेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, अल्पसंख्यांक नेते बशीर मुर्तुझा, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, नगरसेवक मुसा काझी आणि इतर कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघRatnagiriरत्नागिरी