शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पाच राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:31 IST

केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पाच राज्यात प्रथम, देशात दहावा क्रमांक सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी नगर परिषदेची उत्तम कामगिरी

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे.दिल्ली येथून गुरुवारी या स्वच्छ भारत सर्वेक्षणातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. अर्बन अफेअर्स अँड हाऊसिंग मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या दिल्लीतून ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पाच राज्यात सर्वप्रथम आलेल्या रत्नागिरी नगर परिषदेला ५० हजार ते १ लाख नागरी संख्येच्या गटात स्थान देण्यात आले होते.या स्पर्धेत देशभरातील एकूण ४२ शहरांची निवड करण्यात आली. रत्नागिरी शहराने सलग तिसऱ्या वर्षी यात स्थान प्राप्त केले आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणी संकलन करुन त्याचे एकत्र गोळा झाल्यानंतर केलेले वर्गीकरण, शहरात १०० टक्के कचरा संकलन, कचऱ्यातून खतनिर्मिती, प्लास्टिकवर प्रक्रिया तसेच घातक कचऱ्यावर प्रक्रिया आदी प्रकल्प उभे केले आहेत. शहराने ओडीएफ ++ मानांकन मिळविले असून, कचरा मुक्तिबाबत शहराला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.शहराचे प्रथम नागरिक प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिक, पदाधिकारी, शाळा, संस्था, एनजीओ तसेच विविध माध्यमांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले. कचरा संकलनात रत्नागिरी नगर परिषदेचे काम विशेष कौतुकास्पद झाले आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRatnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका