शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरी :फेथाई वादळी वाऱ्याचा मासेमारीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:24 IST

सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही सागरी क्षेत्रातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाता मच्छीमारांनी बंदरांमध्येच नौका नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देफेथाई वादळी वाऱ्याचा मासेमारीला फटकामासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक

रत्नागिरी : सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही सागरी क्षेत्रातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाता मच्छीमारांनी बंदरांमध्येच नौका नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.१ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारी, तर १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, या हंगामातील सागरी मासेमारी सुरू झाल्यापासून काहीना काही नैसर्गिक आपत्तीला मच्छीमारांना सामोरे जावे लागले आहे. वादळी वाऱ्यामुळे याआधीही मासेमारी ठप्प झाली होती. त्यानंतर गोवा सरकारने मासळी आयातीवर बंदी घातल्यानेही जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

राज्यातील व परराज्यातील अन्य बाजारपेठा शोधून तेथे मासळी पाठविण्याचा पर्याय मासेमारांनी शोधलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सागरी क्षेत्रात वादळी वेगवान वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक बनले आहे.या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर, जयगड बंदर, हर्णै बंदर तसेच अन्य बंदरांमध्येच मासेमारी नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रत्नागिरीच्या मिरकरवाडा मासेमारी बंदरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या संख्येमध्ये मासेमारी नौका नांगरण्यात आल्या आहेत.

वादळी वाऱ्यामुळे सागर खवळलेला असून, लाटांचा जोरही वाढलेला आहे. त्यामुळेच मच्छीमारांनी मासेमारीसाठी सागरात जाणे टाळले आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये मासळीची आवक थांबली आहे. मुंबई, अलिबाग येथून येणाऱ्या मासळीची जिल्ह्याच्या बाजारपेठांमध्ये सध्या विक्री केली जात आहे. फेथाई वादळामुळे वादळी हवामान आणखी दोन दिवस राहण्याची भीती व्यक्त होत आहे.पर्ससीन मासेमारीला केवळ चार महिनेच परवानगी देत अन्य कालावधीत पर्ससीन मासेमारीवर शासनाने बंदी घातली आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर अशी परवानगी आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरला म्हणजेच आणखी १३ दिवसांनी पर्ससीन मासेमारी बंद करावी लागणार आहे. नैसर्गिक संकटांमुळे पर्ससीन मासेमारीचा बराच कालावधी मासेमारीविना गेला आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडूकडून आता आंध्रप्रदेशातील मच्छलीपटनम ते काकीनाडा दरम्यान वळवली आहे. या चक्री वादळाचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातही दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला आहे. किनारपट्टीवर वादळी वारेही जोरात वाहात आहेत. त्यामुळेच सागरी मासेमारीवर या वादळी वाऱ्याचे सावट पसरले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग