शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची फेरी; कार्यालयांना घेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:29 IST

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी कार्यभार हातात घेताच मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच काही वास्तूंना भेटी देण्याचा धडाका लावला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची फेरी; कार्यालयांना घेरीमॉर्निंग वॉकच्या माध्यमातून शासकीय वास्तूंना भेटी देण्याचा धडाका

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरीचेजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महिनाभरापूर्वी कार्यभार हातात घेताच मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालये, रूग्णालये तसेच काही वास्तूंना भेटी देण्याचा धडाका लावल्याने आता अनेक कार्यालयांनी साहेब कधीही आपल्या कार्यालयात थडकतील, याचा धसका घेतला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची स्वतंत्र अशी वेगळी शैली असते, त्यामुळे तो अधिकारी बदलून गेला तरी त्याची ती विशिष्ट शैली नागरिकांच्या स्मरणात रहाते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही रत्नागिरीत आल्यानंतरच रत्नागिरीची ओळख स्वत:च करून घेण्याच्या आपल्या या वेगळ्या शैलीचे दर्शन घडविले आहे. रत्नागिरीत आल्यानंतरच अवघ्या पंधरा दिवसांतच त्यांनी ही मॉर्निंग वॉक मोहीम राबविण्यास सुरूवात केली.

पहिल्यांदा त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनला भेट देऊन तिथली कार्यालये, गळक्या इमारती, विद्यार्थी - विद्यार्थीनींच्या दुरवस्था झालेली वसतीगृहे यांची पाहाणी केली. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांशीही हितगुज करताना त्यांना येथील समस्या अधिकच जाणवल्या. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आपल्या समस्या समजून घेत आहेत, या भावनेने त्या मुलांनाही कमालीचा आनंद झाला होता.

त्यानंतर दोन - तीन दिवसांत त्यांनी थिबा पॅलेस, प्रादेशिक मनोरूग्णालय, जिल्हा रूग्णालये यांनाही अकस्मात भेट देवून तिथल्या इमारतींची, रूग्णांसाठी असलेल्या सोयी सुविधांची पाहाणी केल्याने येथील गैरसोयी, समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या.

या कालावधीत त्यांनी काही शाळांचीही पाहाणी केली. तिथल्या छोट्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला. कार्यालयांना भेटी दिल्यानंतर त्यांनी आवश्यक असलेल्या काही सूचनाही त्यांना केल्या. जिल्हाधिकारी यांनी सोबतीला कोणतीही यंत्रणा न घेता, एकट्याने जावून पाहाणी करण्याच्या या घटना आत्तापर्यंतच्या रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्या आहेत.जिल्हाधिकारी कुठल्याही क्षणी आपल्या कार्यालयात येवून थडकतील, हा धसका मात्र, इतर कार्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे या भीतीने ही कार्यालये आपले कामकाज योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करू लागली आहेत, हा सकारात्मक बदलही लक्षात घ्यायला हवा.

आताही तालुक्याच्या दौऱ्यावर जाऊन तिथली पाहाणी करून ते समस्या समजावून घेत आहेत. नागरिकांनी आपल्या पर्यंत समस्या आणाव्यात यापेक्षाही आपण त्यांच्यापर्यंत अधिकाधीक पोहोचून त्या समजून घ्याव्यात, या त्यांच्या तळमळीला दाद द्यायलाच हवी.एकंदरीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे सुरूवातीचे मॉर्निंग वॉक रत्नागिरीतील विविध समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास फलद्रुप ठरले असून आता या समस्या लवकर सुटाव्यात तसेच शासकीय कार्यालयांच्या कामकाजात सकारात्मक बदल व्हावेत, अशी अपेक्षा सामान्य रत्नागिरीकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी