शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तिसरे

By admin | Updated: June 20, 2014 00:18 IST

मुलीचा जन्मदर : जिल्ह्यात हजारी ४७ ने झाली वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात मुलींच्या जननदरात गतवर्षीच्या तुलनेत हजारी ४७ ने वाढ झाली आहे. २०१२-१३ मध्ये मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत मुलींचे जन्मदर प्रमाण हजारी ९२३ होते. राज्यातील जिल्हा रुग्णालयातील २०१३-१४ च्या मुले-मुली जननदरात रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा तिसरा क्रमांक आला आहे. राज्यात अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील मुलींचा जननदर हा राज्यातील प्रथम तर वर्धा जिल्हा रुग्णालयातील मुलींचा जननदर हा द्वितीय क्रमांकाचा आहे. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे यांनी दिली. गेल्या काही वर्षात राज्यातील जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, शिक्षण देणारी रुग्णालये व महिला रुग्णालयांमधील मुलींच्या जननदराची आकडेवारी संकलित केली जात आहे. त्यावरून मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्मप्रमाण काय आहे, याचा शासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात असून या जननदरात अधिक फरक राहणार नाही याकडे शासन जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. अनेक ठिकाणी मुलगी म्हणजे कर्जाचा बोजा तर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा गैरसमज अद्यापही दृढ असल्याने सोनोग्राफी करून मुलीचा गर्भ असल्यास तिला गर्भातच मारले जाण्याचे अर्थात भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले होते. शासनाने सोनोग्राफीबाबतचे नियम अत्यंत कठोर करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्याचे दृश्य परिणाम आता दिस ूलागले आहेत. त्याचबरोबर मुलांप्रमाणे मुलगीही वंशाचा दिवा असल्याबाबत पथनाट्य व अन्य मार्गांनी प्रबोधन केले जात आहे. त्याचा परिणामही समाजात दिसून येत आहे.रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयानेही यामध्ये उत्तम कामगिरी केल्याचे नारोळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)