शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात रिपाई लढणार स्वतंत्र...!

By admin | Updated: September 25, 2014 23:30 IST

जे. पी. जाधव : महायुतीमधील संघर्षामुळे कार्यकर्ते नाराज

देवरुख : सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावरुन चाललेला प्रचंड गोंधळ अद्यापही कायम असून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला मिळत असलेली वागणूक पहाता रिपाईचे पक्ष नेतृत्वासह कार्यकर्तेदेखील नाराज झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करीत जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागा आपण स्वतंत्रपणे स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव व कोकण प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी देवरुख येथे पत्रकार परिषदेत केली.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आणि नऊ तालुकाध्यक्षांची मते जाणून घेतल्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी कोकण कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे, पक्ष प्रवक्ते अनंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष अ. वि. जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रितम रुके, जिल्हा युवाध्यक्ष आदेश मर्चंडे, युवा सरचिटणीस संदीप कदम, कोषाध्यक्ष मिलींद तांबे उपस्थित होते. तसेच रत्नागिरी तालुकाध्यक्ष तु. गो. सावंत, लांजाचे वि. धा. जाधव, राजापूरचे राजन बेतकर, संगमेश्वरचे वाय. जी. पवार, गुहागरचे महेंद्र कदम, खेडचे शंकर तांबे, दापोलीचे अजीत तांबे, मंडणगडचे भरत यादव यांच्याबरोबरचख देवरुखचे रा. ना. जाधव, कृ ष्णा कदम उपस्थित होते.यावेळी पाचही जागा लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव यांनी स्पष्ट करीत उमेदवारांची घोषणाही केली. त्यामध्ये राजापूर मतदार संघातून राजन बेतकर, वि. धा. जाधव, रत्नागिरीतून रजत पवार, तु. गो. सावंत, चिपळूणमधून अ. वि. जाधव, वाय. जी. पवार, गुहागरमधून अनंत पवार, विजय असगोलकर तर दापोलीमधून अजित तांबे, आदेश मर्चंडे यांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले.पुढे बोलताना कोकण कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे म्हणाले की, सध्याची युतीमधील शिवसेना आणि भाजप यांची भूमिका लक्षात घेता चर्चा लांबवायची आणि रिपाई त्या गाफील ठेवायचे आणि मग त्यांना युतीमधील पर्यायावाचून निर्णयच राहणार नाही, अशी त्यांची अवस्था करायची, असे चित्र स्पष्ट होत आहे.रिपाईला सन्मानपूर्वक वागणूकही महायुतीकडून दिली जात नसल्याचा आरोप करीत केवळ स्थानिक पातळीवरील जिल्हा पातळीवरील नेत्यांनी - कार्यकर्त्यांनी आपल्याला अद्यापही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शविली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.शेवटी बोलताना कासारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व धोक्यात येवू नये म्हणूनच पक्षाची ताकद काय आहे, ते निवडणुकीनंतर महायुतीला कळेलच. एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, युती होण्याची शक्यता आता मावळली आहे. मात्र तरीही युती झाल्यास पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसारच पुढील रणनिती ठरविली जाईल आणि पाचही जागा स्वबळावरच लढविण्याची तयारी आपण पक्षाच्यावतीने केल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (प्रतिनिधी)