शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यात बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: April 1, 2017 18:32 IST

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना, २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागिल आर्थिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात २९५ बायोगॅस उभारण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.ग्रामीण भागातील चुलींना पर्याय म्हणून बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना, यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. शिवाय कंपन्यांकडून गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचाच ठरत आहे. त्यासाठी शासनाने बायोगॅस प्रकल्क उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़ एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफूटासाठी ९ हजार रुपये देण्यात योतत़ त्याला शौचालय जोडल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्या जनावर असणे अवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आतापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली. एकीकडे मागेल त्याला बायोगॅस, तर दुसरीकडे या मागणीसाठी जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती. अखेर कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येवून बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २७० बायोगॅस आणि २०१६-१७ मध्ये २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने कृषी विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे़