शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: April 1, 2017 18:32 IST

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना, २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागिल आर्थिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात २९५ बायोगॅस उभारण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.ग्रामीण भागातील चुलींना पर्याय म्हणून बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना, यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. शिवाय कंपन्यांकडून गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचाच ठरत आहे. त्यासाठी शासनाने बायोगॅस प्रकल्क उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़ एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफूटासाठी ९ हजार रुपये देण्यात योतत़ त्याला शौचालय जोडल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्या जनावर असणे अवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आतापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली. एकीकडे मागेल त्याला बायोगॅस, तर दुसरीकडे या मागणीसाठी जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती. अखेर कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येवून बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २७० बायोगॅस आणि २०१६-१७ मध्ये २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने कृषी विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे़