शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रत्नागिरी : मत्स्यालयातील अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे तोशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:33 IST

रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देरत्नागिरी मत्स्यालयातील अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे तोशेरेमत्स्य व्यवसायाची पाहणी : अचानक दौऱ्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ

रत्नागिरी : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.रत्नागिरीचेजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. बोर्डिंग रोड येथील अध्यापक महाविद्यालय तसेच फणशी परिसरातून परटवणेकडे चालत जाताना त्यांनी नगर परिषदेच्या खचलेल्या रस्त्याची पाहणी केली.

परटवणे येथील पुलाचे अनेक वर्षे काम न झाल्यामुळे त्याचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. या पुलावर सदैव वाहतूककोंडी होते. भविष्यात जड वाहनांमुळे या पुलाला धोका पोहोचू नये, यासाठी हा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी खेडेकरवाडीतून पालकर हॉस्पिटल चौकात बंद असणाऱ्या पोलीस चौकीची दुरवस्था पाहिली व तेथून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला भेट दिली. रत्नागिरी जिल्ह्याचे हे प्रमुख कार्यालय असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छीमार ये-जा करत असतात.

या ठिकाणी असणारे खेकडा संवर्धन, कोळंबी प्रकल्प याची पाहणी करताना येणाऱ्या मच्छीमारांना ते कसे फायदेशीर ठरतील, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने रत्नागिरी मत्स्यालयाला भेट देऊन तेथे असणारे विविध जातीचे मासे आणि देवमाशाची माहितीही घेतली.या मत्स्यालयासंदर्भात त्यांनी पर्यटकांचा ओढा वाढावा, यासाठी आवश्यक त्या सूचना केल्यात्यानंतर मिऱ्या ते कोल्हापूर या महामार्गावरून जाताना शहरातील अनेकांनी टाकलेला कचरा त्यांना आढळून आल्याने त्यांनी स्वच्छतेसंबंधी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे अनेकांची मात्र तारांबळ उडाली.अस्वच्छतेबद्दल जिल्हाधिकारी नाराज...शासनाने नुकताच स्वच्छता पंधरवडा राबवला. परंतु या कार्यालयाकडून स्वच्छता न झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वत्र शासनाकडून स्वच्छता पंधरवडा राबविला जात आहे. मात्र, अनेक शासकीय कार्यालयातून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या  मार्निंग वॉकच्या निमित्ताने निदर्शनास आले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार