शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

रत्नागिरी जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या ६५० शाळा बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:17 IST

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर या शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शाळा बंद करण्यात येणार नसल्या, तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली ...

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर या शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शाळा बंद करण्यात येणार नसल्या, तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली चालू शैक्षणिक वर्षात शेकडो शाळा बंद करुन तेथील मुलांचे अन्य जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकवर्गातही अस्वस्थता पसरली आहे.जिल्हा परिषदेच्या २ हजार ६२१ प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये सुमारे ७ हजार ५०० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. या शाळांमध्ये ० ते १० पटसंख्येच्या सुमारे ६५० प्राथमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येतात. तसेच या शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओघ चिंतेची स्थिती निर्माण करणारा आहे़जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मार्च-एप्रिल महिन्यादरम्यान प्रत्येक तालुक्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा तसेच स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो़ दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याने पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना सतत आटापिटा करावा लागतो़ पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांनाही अतिरिक्त ठरण्याची भीती सतत जाणवत असते़ त्यामुळे पटसंख्येअभावी शाळा बंद होऊ नये, यासाठी शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांची शोधमोहीम सतत सुरु असते़ ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहूनच शिक्षकांची निश्चिती करण्यात येते़ त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये किती शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, हे आता लवकरच समजणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची घसरलेली पटसंख्या ही शिक्षकांसाठी चिंतेचे बाब बनत चालली आहे. आरटीई कायद्यानुसार कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ८८ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यंदाही पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. कमी पटसंख्येमुळे शाळा बंद करण्यात आल्याने मागील शैक्षणिक वर्षात १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असून, त्याला शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध सुरु आहे. शाळा बंद झाल्यास त्याचे परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे.