शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:21 IST

पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थांना दिलासा, वाद संपुष्टात आल्याने आनंदवादामुळे बस फेऱ्या ठेवल्या होत्या बंद

रत्नागिरी : पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.पोलादपूर तालुक्यातील कालवली मोहल्ला येथील रस्ता, पैठण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रालगतचा रस्ता वादातीत राहिला होता. या रस्त्यांबाबतच्या वादावर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील कातळी पळचील या रस्त्यावरील वाद सुरू होता.कशेडी टॅब पोलीस चौकीच्या समोरील या रस्त्याच्या डाव्या बाजूची घरे रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असून, उजव्या बाजूच्या घरांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे समोरासमोरील कुटुंबांना या वादाचा फटका बसत होता. या रस्त्यावरून पळचील, गोलदरा, तामसडे, महालगूर भागात जाणाऱ्या वाहनांना विशेषत: एस्. टी. महामंडळाच्या बसेसना रायगड हद्दीतील घराच्या काँक्रीटच्या कम्पाऊंड वॉलचा अडथळा होत होता. त्यामुळे अलिकडेच येथून पळचीलकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या होत्या.याविषयी पोलादपूर तहसीलदार घोरपडे यांनी नायब तहसीलदार समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीसपाटील आनंद निविलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्यावरील वादग्रस्त अतिक्रमण असलेली कम्पाऊंड वॉल जेसीबीद्वारे भुईसपाट करून हा वाद कायमचा दूर केला. परिणामी, या रस्त्यावरून बंद झालेल्या बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaigadरायगड