शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:21 IST

पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थांना दिलासा, वाद संपुष्टात आल्याने आनंदवादामुळे बस फेऱ्या ठेवल्या होत्या बंद

रत्नागिरी : पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.पोलादपूर तालुक्यातील कालवली मोहल्ला येथील रस्ता, पैठण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रालगतचा रस्ता वादातीत राहिला होता. या रस्त्यांबाबतच्या वादावर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील कातळी पळचील या रस्त्यावरील वाद सुरू होता.कशेडी टॅब पोलीस चौकीच्या समोरील या रस्त्याच्या डाव्या बाजूची घरे रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असून, उजव्या बाजूच्या घरांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे समोरासमोरील कुटुंबांना या वादाचा फटका बसत होता. या रस्त्यावरून पळचील, गोलदरा, तामसडे, महालगूर भागात जाणाऱ्या वाहनांना विशेषत: एस्. टी. महामंडळाच्या बसेसना रायगड हद्दीतील घराच्या काँक्रीटच्या कम्पाऊंड वॉलचा अडथळा होत होता. त्यामुळे अलिकडेच येथून पळचीलकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या होत्या.याविषयी पोलादपूर तहसीलदार घोरपडे यांनी नायब तहसीलदार समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीसपाटील आनंद निविलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्यावरील वादग्रस्त अतिक्रमण असलेली कम्पाऊंड वॉल जेसीबीद्वारे भुईसपाट करून हा वाद कायमचा दूर केला. परिणामी, या रस्त्यावरून बंद झालेल्या बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaigadरायगड