शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:21 IST

पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थांना दिलासा, वाद संपुष्टात आल्याने आनंदवादामुळे बस फेऱ्या ठेवल्या होत्या बंद

रत्नागिरी : पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.पोलादपूर तालुक्यातील कालवली मोहल्ला येथील रस्ता, पैठण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रालगतचा रस्ता वादातीत राहिला होता. या रस्त्यांबाबतच्या वादावर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील कातळी पळचील या रस्त्यावरील वाद सुरू होता.कशेडी टॅब पोलीस चौकीच्या समोरील या रस्त्याच्या डाव्या बाजूची घरे रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असून, उजव्या बाजूच्या घरांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे समोरासमोरील कुटुंबांना या वादाचा फटका बसत होता. या रस्त्यावरून पळचील, गोलदरा, तामसडे, महालगूर भागात जाणाऱ्या वाहनांना विशेषत: एस्. टी. महामंडळाच्या बसेसना रायगड हद्दीतील घराच्या काँक्रीटच्या कम्पाऊंड वॉलचा अडथळा होत होता. त्यामुळे अलिकडेच येथून पळचीलकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या होत्या.याविषयी पोलादपूर तहसीलदार घोरपडे यांनी नायब तहसीलदार समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीसपाटील आनंद निविलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्यावरील वादग्रस्त अतिक्रमण असलेली कम्पाऊंड वॉल जेसीबीद्वारे भुईसपाट करून हा वाद कायमचा दूर केला. परिणामी, या रस्त्यावरून बंद झालेल्या बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaigadरायगड