शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी : प्लास्टिकबंदी आॅक्टोबरपासून तीव्र होणार, प्रशासनाची आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:37 IST

पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

ठळक मुद्देपिशव्यांचा वापर थांबवावा लागणार व्यापाऱ्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरी : पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.केंद्रीय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी लागू करण्यात आली. तसं पाहिलं तर ही बंदी ३१ मार्चनंतर लागू करण्यात आली होती. मात्र, ही बंदी थोडी शिथील झाल्याने २३ जूनपासून बंदी कडक करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले.

त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. मात्र, आतापर्यंत सर्वच वापरासाठी अत्यावश्यक असणारी प्लास्टिक पिशवी बंद झाल्याने सर्वत्र गोंधळ सुरू झाला.प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने अनेक दुकानांवर छापे टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील काही कापड विक्रेत्यांच्या दुकानावर नगरपरिषदेने छापा मारून कित्येक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. एवढेच नव्हे; तर या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे पाऊलही उचलले.यानंतर व्यापाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे आमदार उदय सामंत यांच्याकडे मांडले व आणखी मुदत वाढवून मिळण्याची विनंती केली. त्यानुसार सामंत यांनी पर्यावरणमंत्री यांच्याशी संभाषण केले. सप्टेंबरअखेर मुदत मिळाली. मात्र, आता सप्टेंबर संपत आल्याने आॅक्टोबरपासून पुन्हा ही मोहीम तीव्र होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRatnagiriरत्नागिरी