शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

रत्नागिरी : प्लास्टिकबंदी आॅक्टोबरपासून तीव्र होणार, प्रशासनाची आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:37 IST

पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

ठळक मुद्देपिशव्यांचा वापर थांबवावा लागणार व्यापाऱ्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरी : पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.केंद्रीय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी लागू करण्यात आली. तसं पाहिलं तर ही बंदी ३१ मार्चनंतर लागू करण्यात आली होती. मात्र, ही बंदी थोडी शिथील झाल्याने २३ जूनपासून बंदी कडक करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले.

त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. मात्र, आतापर्यंत सर्वच वापरासाठी अत्यावश्यक असणारी प्लास्टिक पिशवी बंद झाल्याने सर्वत्र गोंधळ सुरू झाला.प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने अनेक दुकानांवर छापे टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील काही कापड विक्रेत्यांच्या दुकानावर नगरपरिषदेने छापा मारून कित्येक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. एवढेच नव्हे; तर या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे पाऊलही उचलले.यानंतर व्यापाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे आमदार उदय सामंत यांच्याकडे मांडले व आणखी मुदत वाढवून मिळण्याची विनंती केली. त्यानुसार सामंत यांनी पर्यावरणमंत्री यांच्याशी संभाषण केले. सप्टेंबरअखेर मुदत मिळाली. मात्र, आता सप्टेंबर संपत आल्याने आॅक्टोबरपासून पुन्हा ही मोहीम तीव्र होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRatnagiriरत्नागिरी