शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्लास्टिकबंदी आॅक्टोबरपासून तीव्र होणार, प्रशासनाची आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:37 IST

पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

ठळक मुद्देपिशव्यांचा वापर थांबवावा लागणार व्यापाऱ्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरी : पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.केंद्रीय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी लागू करण्यात आली. तसं पाहिलं तर ही बंदी ३१ मार्चनंतर लागू करण्यात आली होती. मात्र, ही बंदी थोडी शिथील झाल्याने २३ जूनपासून बंदी कडक करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले.

त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. मात्र, आतापर्यंत सर्वच वापरासाठी अत्यावश्यक असणारी प्लास्टिक पिशवी बंद झाल्याने सर्वत्र गोंधळ सुरू झाला.प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने अनेक दुकानांवर छापे टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील काही कापड विक्रेत्यांच्या दुकानावर नगरपरिषदेने छापा मारून कित्येक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. एवढेच नव्हे; तर या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे पाऊलही उचलले.यानंतर व्यापाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे आमदार उदय सामंत यांच्याकडे मांडले व आणखी मुदत वाढवून मिळण्याची विनंती केली. त्यानुसार सामंत यांनी पर्यावरणमंत्री यांच्याशी संभाषण केले. सप्टेंबरअखेर मुदत मिळाली. मात्र, आता सप्टेंबर संपत आल्याने आॅक्टोबरपासून पुन्हा ही मोहीम तीव्र होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRatnagiriरत्नागिरी