शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

रत्नागिरी : भरमसाठ बिलांनी मोडले ग्राहकांचे कंबरडे, मे महिन्यात मोठा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:47 IST

उष्म्याने हैराण झालेल्या ग्राहकांना एप्रिल महिन्यापासून सलग दोन महिने महावितरण कंपनीने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ विजबिलांनी ग्राहक वैतागला असून, त्रस्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यातील काही वीजमीटर बदलण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देभरमसाठ बिलांनी मोडले ग्राहकांचे कंबरडे, मे महिन्यात मोठा झटका  अनेक ग्राहकांची महावितरणकडे धाव

रत्नागिरी : उष्म्याने हैराण झालेल्या ग्राहकांना एप्रिल महिन्यापासून सलग दोन महिने महावितरण कंपनीने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ विजबिलांनी ग्राहक वैतागला असून, त्रस्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यातील काही वीजमीटर बदलण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.सध्या उष्म्यामुळे नागरिक हैराण आहेत. उष्म्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. ही संधी साधून महावितरण कंपनीने ग्राहकांना जणू लुबाडण्यास सुरुवात केली आहे. महावितरणकडून एप्रिल व मे महिन्यात वितरित करण्यात आलेली वीजबिले ३० ते २५०० एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून आली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांचा महावितरण अधिकाऱ्यांना सामना करावा लागत आहे.राजिवडा, तेलीआळी, खालची आळी, जयस्तंभ आदी परिसरातील ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे. याच परिसरात बिले वाढवून आली आहेत. दोन दिवसांपूर्वी याच प्रश्नावर महावितरणच्या झाडगाव येथील कार्यालयावर विविध ठिकाणच्या सुमारे २० ते २५ ग्राहकांनी अचानक धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.ज्या ग्राहकाचे सरासरी बिल १७०० होते, त्या ग्राहकाला अडीच हजार रुपयांपर्यंत बिल आले आहे. एका ग्राहकाला तर महावितरणने मोठाच फटका दिला आहे. सरासरी बिल दीड हजार येत असताना महावितरणने या महिन्यात सुमारे ४ हजार बिल पाठवले आहे. यातील काही ग्राहकांनी एवढे विजबिल भरण्यास असमर्थता दर्शवली आहे.काही ग्राहकांचे मीटर बदलले जाणार असून, काही मीटरची तपासणी केली जाणार आहे तर काही बिले ही नजरचुकीने पाठवण्यात आल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी यावेळी कबूल केले. या एकूणच प्रकारामुळे ग्राहक मात्र चांगलाच वैतागला आहे. बिल कमी करून देण्यासही वेळ लागत असल्याने ग्राहकाची कुचंबणा झाली आहे.बिलावर रिडिंगच नाहीअचूक बिलाची प्रत ग्राहकांना मिळावी, यासाठी महावितरणने वीजबिलावर मीटरचा फोटो देण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या काही महिन्यात वीजबिलावरील फोटोमध्ये केवळ मीटरचा क्रमांकच दिसतो, त्यामध्ये रिडिंग दिसत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.नवीन मीटर बदलूनही...?महावितरण कंपनीने काही ग्राहकांचे वीजमीटर आधीच बदलले. मात्र, त्यानंतरही त्यांना वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत, अशा मीटरची पुनर्तपासणी केली जाईल, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.हप्त्याने बिलकाही ग्राहकांना वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्याने त्यांनी ती भरण्यास नकार दिला. मात्र, सध्याची बिले भरा, तुम्हाला मीटर बदलून दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच बिल येईल, असे सांगून त्यांना बिल काही हप्त्यात भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.मोबाईलवर फोटो?यापूर्वी वीजमीटरचे फोटो हे कॅमेऱ्याने टीपले जायचे. त्यामुळे रिडींगचा फोटो येत होता. मात्र, आता हे फोटो साध्या मोबाईलने काढले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी