शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुक: काँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:11 IST

काँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

रत्नागिरी: नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण राबविण्याच्या बाजूने स्थानिक काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे, तर राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या मिलिंद कीर यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील दुसरा गट सक्रिय आहे. परिणामी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

रलागिरीच्या नगराध्यक्ष पदावरून शिवसेनेचे राहुल पंडित यांनी सहा महिन्यांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पद रिक्त असलेल्या काळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नगरसेवक बंड्या साळवी यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता येत्या २९ डिसेंबरला थेट नगराध्यक्ष निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप प्रताप तथा बंड्या साळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व भाजपचे जिल्हा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मनसेचे रूपेश सावंत व अपक्ष मुकुंद जोशी हेसुध्दा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीतर्फे अर्ज भरण्याऐवजी मिलिंद कीर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना शहर विकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी व अन्य घटक पक्षांचा पाठिंबा राहणार आहे.

काँग्रेसने या निवडणुकीत प्रथम आघाडीपासून अलिप्तता दाखवित स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर स्वतंत्र उमेदवार उभा करण्यास काँग्रेसमधील एक गटाने विरोध केला. हा गट महाविकास आघाडीच्या दिशेने जात शिवसेनेकडे झुकत असल्याचे दिसताच जिल्हाअध्यक्ष विजय भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांना काँग्रेस पाठिबा देत असल्याचे पत्र दिले आहे.

लांजावर ठरणार: 17 ची बैठक महत्वाची

राष्ट्रवादीला पाठींबा दिल्यानंतर काँग्रेसने पुन्हा भूमिका बदलली आहे. राष्ट्रवादीला पाठींबा द्यावा किंवा नाही, याबाबतचा निर्णय लांजा नगर पंचायत निवडणुकीत आघाडी करण्याबाबतच्या निर्णयावर अवलंबून आहे. 17 डिसेंबरला काँग्रेस व राष्ट्रवादीची या विषयावर संयुक्त बैठक होणार असून, त्यावेळी रत्नागिरीत राष्ट्रवादीला पाठींबा द्यायचा की नाही, हे ठरणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा घेता काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका गटाचे सहकार्य शिवसेनेचे उमेदवार बंडया साळवी यांना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी काँग्रेसमधील ही गटबाजी शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे.