शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: नगराध्यक्ष निवडणुकीत आरोपांच्या फैरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 17:42 IST

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे.

रत्नागिरी: रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तर शिवसेना, शहर विकास आघडी व भाजप यांच्यात तेहरी लढत होण्याची शक्यता आहे. तर राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना मिलिंद कीर यांनी अनेक विकासकामे अडवून ठेवली. लाखो रुपये खर्चून अर्धवट स्थितीत बांधलेला शहरातील परटवणे पूल वापराविना पडून आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना पुलाचे काम आपण केल्याचे सांगणाऱ्या मिलिंद कीर यांनी अपूर्णावस्थेत असलेल्य पुलाची जबाबदारीही घ्यावी, रत्नागिरीकरांची दिशाभूल करू नये, असा टोला प्रभारी नगराध्यक्ष व नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  लगावला.

साळवी यांनी केलेल्या आरोपाला रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उत्तर दिले आहे. रत्नागिरी शहरातील पटवणे पुलाच्या बॉक्सचे ४६ लाखांचे काम ७ मार्च २०१३पर्यंत आपण नगराध्यक्ष असताना पूर्ण केले होते. तसेच उर्वरित कामासाठी ६० लाखांचे अंदाजपत्रकही तयार केले होते. मात्र, २०१६ पासून नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असताना थेट नगराध्यक्ष राहुल पंडित यांना विकासाची कामे करण्यामध्ये बंड्या साळवी यांनीच अडथळा केला. गेल्या ६ महिन्यांपासून साळवी यांनी कोणता विकास केला, हे दाखवून द्यावे, असा प्रतिहल्ला मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राज्यातील सत्तेच्या चाव्या हाती नसलेल्यांकडून जनतेला शहर विकासाच्या मोठ्या योजना दाखविल्या जात आहेत. आचारसंहितेपूर्वी कार्यादेश दिलेल्या रस्त्यांची कामे आम्ही पूर्ण केली आहेत. त्यामुळे जनता शिवसेनेच्याच पाठीशी राहील, असा विश्वास बंड्या साळवी यांनी व्यक्त केला. तर राहुल पंडित यांच्या नगराध्यक्षपद राजीनाम्यानंतर बंड्या साळवी हे गेल्या ६ महिन्यांपासून प्रभारी नगराध्यक्ष आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी केल्यानंतरही पुन्हा नगर परिषदेच्या निधीतून बुजविण्यात आले आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्यात आले, असा आरोप कीर यांनी केला आहे.