शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

रत्नागिरी: नगराध्यक्ष निवडणुकीत आरोपांच्या फैरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 17:42 IST

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे.

रत्नागिरी: रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तर शिवसेना, शहर विकास आघडी व भाजप यांच्यात तेहरी लढत होण्याची शक्यता आहे. तर राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना मिलिंद कीर यांनी अनेक विकासकामे अडवून ठेवली. लाखो रुपये खर्चून अर्धवट स्थितीत बांधलेला शहरातील परटवणे पूल वापराविना पडून आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना पुलाचे काम आपण केल्याचे सांगणाऱ्या मिलिंद कीर यांनी अपूर्णावस्थेत असलेल्य पुलाची जबाबदारीही घ्यावी, रत्नागिरीकरांची दिशाभूल करू नये, असा टोला प्रभारी नगराध्यक्ष व नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  लगावला.

साळवी यांनी केलेल्या आरोपाला रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उत्तर दिले आहे. रत्नागिरी शहरातील पटवणे पुलाच्या बॉक्सचे ४६ लाखांचे काम ७ मार्च २०१३पर्यंत आपण नगराध्यक्ष असताना पूर्ण केले होते. तसेच उर्वरित कामासाठी ६० लाखांचे अंदाजपत्रकही तयार केले होते. मात्र, २०१६ पासून नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असताना थेट नगराध्यक्ष राहुल पंडित यांना विकासाची कामे करण्यामध्ये बंड्या साळवी यांनीच अडथळा केला. गेल्या ६ महिन्यांपासून साळवी यांनी कोणता विकास केला, हे दाखवून द्यावे, असा प्रतिहल्ला मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राज्यातील सत्तेच्या चाव्या हाती नसलेल्यांकडून जनतेला शहर विकासाच्या मोठ्या योजना दाखविल्या जात आहेत. आचारसंहितेपूर्वी कार्यादेश दिलेल्या रस्त्यांची कामे आम्ही पूर्ण केली आहेत. त्यामुळे जनता शिवसेनेच्याच पाठीशी राहील, असा विश्वास बंड्या साळवी यांनी व्यक्त केला. तर राहुल पंडित यांच्या नगराध्यक्षपद राजीनाम्यानंतर बंड्या साळवी हे गेल्या ६ महिन्यांपासून प्रभारी नगराध्यक्ष आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी केल्यानंतरही पुन्हा नगर परिषदेच्या निधीतून बुजविण्यात आले आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्यात आले, असा आरोप कीर यांनी केला आहे.