शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : लांजातील खोरनिनको धरणात सिमेंट पिशव्यांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 13:17 IST

खोरनिनको धरणाच्या पाणीसाठ्यात सिमेंटच्या पिशव्यांचा प्रचंड खच असल्याचे समोर आले आहे

लांजा : खोरनिनको धरणाच्या पाणीसाठ्यात सिमेंटच्या पिशव्यांचा प्रचंड खच असल्याचे समोर आले आहे. यामुळे धरणातील पाणी दूषित होऊन याच पाण्याचा परिसरातील ग्रामस्थांना पुरवठा होत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे येणाºया पर्यटकांचाही सिमेंटच्या पिशव्यांचा खच पाहून हिरमोड होत आहे. 

तालुक्यातील पूर्व भागातील प्रसिध्द व विस्तृत अशा मुचकुंदी नदीवर खोरनिनको येथे मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या प्रचंड पाणीसाठवण क्षमतेमुळे हे धरण बांधल्यानंतर लगेचच पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. पावसाळ्यात येथे पावसाळी पर्यटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. हिवाळ्यातही या परिसरात असणाऱ्या बल्लाळ गणेश देवस्थान आणि शिवकालीन गुहा पाहण्यासाठी येणारे पर्यटक या धरणाला आवर्जून भेट देत असतात. पर्यटकांमध्ये पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले खोरनिनको धरण सध्या मात्र धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात असलेल्या सिमेंटच्या पिशव्यांमुळे कुप्रसिद्ध ठरत आहे.

पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाºया या धरणाची पाणीपातळी सध्या खालावली आहे. पाणीपातळी खालावल्याने धरणाच्या एका बाजुला असलेल्या सिमेंटच्या पिशव्यांचा खच दिसू लागला आहे. काही पिशव्या अजूनही पाणी साठ्यात दिसून येत आहेत. प्रचंड प्रमाणात असलेल्या या सिमेंटच्या पिशव्यांमुळे पाणी साठ्यातील पाणी प्रदूषित होत आहे. हेच प्रदूषित पाणी नदीत सोडले जाऊन ते पाणी परिसरातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

धरणाचा विस्तीर्ण पसरलेला पाणीसाठा डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात. विस्तीर्ण पाणी साठ्यासाठीच हे धरण प्रसिध्द आहे. याच विस्तीर्ण पसरलेल्या पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात ठिकठिकाणी सिमेंटच्या पिशव्यांचा खच दिसत असल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

प्रदूषणाचा विळखाया पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखायचे असेल तर या पिशव्या हटविणे गरजेचे असून, पाणीसाठ्यात सिमेंटच्या पिशव्यांचा खच पाहून येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत असल्याने पर्यटक या धरणाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या पिशव्या हटविण्याची मागणी होत आहे. या पिशव्या वेळीच हटविण्यात आल्या नाहीत तर हे धरणाला प्रदूषणाचा विळखा बसण्याची शक्यता आहे.