शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांकडे ३ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:43 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांची वीजबिले वेळेत न भरल्यामुळे कोट्यवधीची रुपयांची थकबाकी आहे. ७ हजार ३६ शासकीय कार्यालयांनी वीजबिले न भरल्यामुळे ३ कोटी १९ लाख ४१ हजार रूपयांची थकबाकी राहिली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी शासकीय कार्यालयांकडे ३ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकीवीज पुरवठा तत्काळ खंडित करण्याचा आदेश थकबाकी वसुलीची महावितरणने दिली सूचना

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांची वीजबिले वेळेत न भरल्यामुळे कोट्यवधीची रुपयांची थकबाकी आहे. ७ हजार ३६ शासकीय कार्यालयांनी वीजबिले न भरल्यामुळे ३ कोटी १९ लाख ४१ हजार रूपयांची थकबाकी राहिली आहे. थकबाकी वसुलीच्या सूचना महावितरणने दिली असून, थकबाकी न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्याचा आदेश दिला आहे.शासकीय कार्यालयांकडून वीजबिले थकल्यामुळेच थकबाकीची रक्कम वाढली आहे. जिल्ह्यातील वित्त विभागाच्या जिल्हा कार्यालयाकडे १० हजार, अन्न प्रशासनाच्या १० कार्यालयाकडे ३७ हजार, सामान्य प्रशासनाच्या १३ कार्यालयांकडे १४ हजार, ग्रामपंचायतींच्या ३ हजार २०२ कार्यालयांकडे २ कोटी ५१ लाख १८ हजार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या २ कार्यालयांकडे २ हजार, गृह विभागाच्या ९७ कार्यालयांकडे ४ लाख २८ हजार, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या २ कार्यालयांकडे १९ हजार रूपये थकीत आहेत.कृषी विभागाच्या १८ कार्यालयांकडे २२ हजार, ह्यबह्ण वर्गच्या ५६ नगरपालिकेकडे ४९ हजार, ह्यकह्ण वर्गाच्या ९३ नगरपालिकांकडे ३ लाख ४३ हजार, केंद्र शासनाच्या २२ कार्यालयांची ८३ हजार, सहकार व वस्त्र उद्योगच्या ४ कार्यालयांकडे ५७ हजार, पर्यावरण विभागाच्या ४ कार्यालयांकडे १४ हजार रूपये थकबाकी शिल्लक आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १८८० कार्यालयांकडे २१ लाख ४८ हजार, शिक्षण विभागाच्या ९७ कार्यालयांकडे १ लाख २१ हजार, राज्य शासनाच्या ६७२ कार्यालयांकडे ७ लाख ४३ हजार, जिल्हा परिषदेच्या ८१ कार्यालयांकडे १ लाख १० हजार, रेल्वेच्या २१ कार्यालयांकडे १२ हजार, समाजकल्याणच्या १६ कार्यालयांकडे ७ हजार रूपये थकीत आहेत.स्थानिक प्राधिकरणाच्या २४१ कार्यालयांकडे १० लाख २० हजार, औद्योगिक विकास महामंडळाच्या ८ कार्यालयांकडे ५१ हजार, नगरपालिका प्रशासनाच्या ९५ कार्यालयांची २ लाख १० हजार, नियोजन विभागाच्या ५४ कार्यालयांकडे ६१ हजार, महसूल व वन विभागाच्या २६ कार्यालयांकडे २ लाख ३१ हजार रूपये थकीत आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ७ कार्यालयांकडे २५ हजार, पर्यावरण विभागाच्या ८ कार्यालयांकडे ५१ हजार, कृषी विभागाच्या १८ कार्यालयांकडे २२ हजार रूपये थकीत आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ४४ कार्यालयांकडे एक लाख १५ हजार, सार्वजनिक विभाग केंद्र शासनाच्या ४ कार्यालयांकडे १० हजार , सार्वजनिक विभाग राज्य शासनाच्या २४ कार्यालयांकडे २ लाख ४३ हजार, पाटबंधारे विभागाच्या ४ कार्यालयांकडे ४ हजार, औद्योगिक प्रक्रिया विभागाच्या ६१ कार्यालयांकडे २ लाख ८८ हजार रूपयांची थकबाकी आहे. 

...तर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईथकबाकी वसुलीसाठी महावितरणचे सर्व कर्मचारी ते अधिकारीवर्गापर्यंत सूचना करण्यात आल्या आहेत. थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन तर करण्यात आले आहे. मात्र, थकबाकी न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या सूचनांची अंमलबजाणी न करणारे कर्मचारी आणि अधिकारीवर्गावरही कारवाई करण्यात येणार आहे.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी