शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुजराती शेंगदाण्याला रत्नागिरीचा पर्याय; डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले नवीन वाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:50 IST

या नव्या वाणाचे संशोधन पूर्ण झाले असून, उत्पादकतेची चाचणी स्थानिक शेतांमध्ये घेण्यात येत आहे.

मेहरून नाकाडे -

रत्नागिरी : गोरगरिबांचा ‘बदाम’ म्हणून ओळख असलेला शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो. सद्य:स्थितीत गुजरातमधील भरुच या शेंगदाण्याला मोठी मागणी आहे; पण त्याला टक्कर देईल असे नवीन वाण डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने विकसित केले आहे. या नव्या वाणाचे संशोधन पूर्ण झाले असून, उत्पादकतेची चाचणी स्थानिक शेतांमध्ये घेण्यात येत आहे.

संशोधन पूर्ण झाले असून, आता उत्पादकता मोजण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग सुरू आहेत. नवीन वाण तेलाऐवजी खाण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. - डाॅ. विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव (जि. रत्नागिरी)

भाजलेला, उकडलेला वा कच्चा, कोणत्याही पद्धतीने शेंगदाणा खायला आवडतो. मात्र, ज्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण४५% पेक्षा अधिक असेल ते खायला कडवट लागतात. तेलाचे प्रमाण कमी असलेला दाणा गोडसर व चविष्ट असतो.

शेतात उत्पादकतेची चाचणी सुरूटपोरा, चवीला गोड, कुरकुरीत शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो. गुजरात येथील ‘भरुच’ हा शेंगदाणा तसा असल्याने खाण्यासाठी सर्रास वापरला जातो.तेलासाठी भात संशोधन केंद्राने ‘कोकण टपोरा’ व ‘कोकण भूरत्न’ हे दोन वाण आधीच उपलब्ध करून दिले आहेत.मात्र, खास खाण्यासाठीच्या शेंगदाण्याचे संशोधन केले आहे. हे वाण १२० ते १२५ दिवसांत तयार होणारे आहे. यात तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्के असेल. सध्या शेतात उत्पादकतेची चाचणी सुरू आहे.