शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

रत्नागिरी अग्नीशमन केंद्र उद्घाटनाच्या आशा पल्लवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 14:37 IST

एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे.

ठळक मुद्देया केंद्राचा, निवासी इमारतींचा वापर होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. अन्य शासकीय कर्मचाºयांना ही निवासस्थाने वापरण्यासाठी दिली जातील, असे संकेत

रत्नागिरी : एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे. याठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या केंद्राला जिल्हाधिकारी यांनी भेट दिल्याने केंद्राच्या उद्घाटनाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या छोट्या-मोठ्या ७ उद्योग वसाहती आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात कोणताही अपघात घडल्यास त्यासाठी अग्नीशमन यंत्रणा सुसज्ज राहावी यासाठी जिल्ह्यात अग्नीशमन केंद्राची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार रत्नागिरी एमआयडीसीमधील जागेत अग्नीशमन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे सव्वाचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या इमारतीमध्ये अग्नीशमन केंद्र तसेच कर्मचाºयांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. 

दोन वर्षांपूर्वीच या इमारतीचे काम पूर्ण झालेले असताना, तिचे उदघाटन का रखडले, याची  प्रत्यक्ष खातरजमा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. इमारतीची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. अग्नीशमन यंत्रणेसाठी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून, त्याच्याच बाजूला तीन इमारतींमध्ये कर्मचाºयांसाठी प्रशस्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे २४ ते २५ फ्लॅट उपलब्ध असून, त्यांचेही उदघाटन झालेले नाही. या केंद्राचा, निवासी इमारतींचा वापर होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत प्रत्यक्ष पहाणीवेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाºयांकडे विचारणाही केली. 

आता लवकरच या इमारतींचे उदघाटन केले जाणार असून, कर्मचारी निवासाचीही सोय केली जाणार आहे. तसेच जर अग्नीशमन कर्मचारी उपलब्ध नसतील तर अन्य शासकीय कर्मचाºयांना ही निवासस्थाने वापरण्यासाठी दिली जातील, असे संकेत जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी