शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

रत्नागिरी : विसर्जनानंतर काही तासातच झाला किनारा स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:29 IST

भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

ठळक मुद्दे विसर्जनानंतर काही तासातच झाला किनारा स्वच्छभाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित

रत्नागिरी : भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येतो. गौरी गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्त्या, कापूर पाण्यात टाकण्यात येतात. हे निर्माल्य लाटेबरोबर किनाºयावर येते. त्यामुळे ते पायाखाली येण्याची शक्यता असते. त्याऐवजी सर्व निर्माल्य संकलन करून ते भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहे.

मांडवी येथून दोन ट्रक, तर भाट्ये येथून एक ट्रक निर्माल्य संकलित करण्यात आले. गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतींची संख्या अधिक असते. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही गणपती विसर्जन केले जात असल्यामुळे या दिवशी निर्माल्य संकलन केले जाणार असल्याची माहिती पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी दिली.

संस्थेतर्फे गेली १२ वर्षे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोळा केलेले निर्माल्य प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे पाठविण्यात येते. या केंद्रात निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. तयार केलेले खत रोपवाटिकेसाठी वापरण्यात येते.निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी संकलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. किनाऱ्यावर ठिकठिकाणी प्लास्टिक पिंपही ठेवण्यात आली होती. पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिरगाव मत्स्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये जागृती होत असल्याने, बहुतांश नागरिक स्वत:हून निर्माल्य कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करत होते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी