शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरी : विसर्जनानंतर काही तासातच झाला किनारा स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:29 IST

भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

ठळक मुद्दे विसर्जनानंतर काही तासातच झाला किनारा स्वच्छभाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित

रत्नागिरी : भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येतो. गौरी गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्त्या, कापूर पाण्यात टाकण्यात येतात. हे निर्माल्य लाटेबरोबर किनाºयावर येते. त्यामुळे ते पायाखाली येण्याची शक्यता असते. त्याऐवजी सर्व निर्माल्य संकलन करून ते भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहे.

मांडवी येथून दोन ट्रक, तर भाट्ये येथून एक ट्रक निर्माल्य संकलित करण्यात आले. गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतींची संख्या अधिक असते. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही गणपती विसर्जन केले जात असल्यामुळे या दिवशी निर्माल्य संकलन केले जाणार असल्याची माहिती पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी दिली.

संस्थेतर्फे गेली १२ वर्षे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोळा केलेले निर्माल्य प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे पाठविण्यात येते. या केंद्रात निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. तयार केलेले खत रोपवाटिकेसाठी वापरण्यात येते.निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी संकलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. किनाऱ्यावर ठिकठिकाणी प्लास्टिक पिंपही ठेवण्यात आली होती. पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिरगाव मत्स्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये जागृती होत असल्याने, बहुतांश नागरिक स्वत:हून निर्माल्य कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करत होते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी