शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

रत्नागिरीत ५७३ कॅन्सरचे संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ संशयित रुग्णांमध्ये ३३ रुग्णांना कॅन्सर झाले असल्याचे निदानानंतर स्पष्ट झाले आहे़असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना क्षय, मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, पक्षाघात, हृदयरोग आणि कुष्ठरोग आदिंचा समावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला होता़ या सर्वेक्षणात घरोघरी फिरून माहिती घेण्यात आली होती. कॅन्सरचा धोका सातत्याने वाढत असताना त्याचे प्राथमिक स्तरावर निदान होणे गरजचे आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वेळीच निदान न झाल्यास हा रोग गंभीर स्वरुप धारण करतो़ यामध्ये महिलांच्या स्तनांचा कॅन्सर तसेच तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. स्तनाच्या कॅन्सरप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर याचीही चाचणी करण्यात आली़जिल्ह्यात ५७३ लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत़ यातील ३३ रुग्णांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामध्ये २५ जणांना तोंडाचा, तर ८ महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. तसेच तंबाखूच्या अतिसेवनामुळे पुरुषांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.शहराप्रमाणे ग्रामीण भागात आजही प्रकृतीच्या बदलांना महत्त्व दिले जात नाही़ त्याचा परिणाम म्हणून कॅन्सर असल्याचे उशिरा निदान झाल्यास रूग्ण दगावण्याचीही शक्यता जास्त असते. त्यासाठी असंसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण करताना कॅन्सरची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्यात आली होती़बदलती परिस्थिती आहार अपायकारकसमाजातील बदलती परिस्थिती, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता तसेच दिवसेंदिवस बदलत चाललेला आहार अपायकारक ठरत आहे़ तंबाखूच्या अतिसेवनाप्रमाणे अपायकारक शीतपेये घेणे तसेच केमिकल्सचे आहारातील प्रमाणात वाढ ही कॅन्सर होण्यामागे महत्त्वाची कारणे आहेत़