शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रत्नागिरीत ५७३ कॅन्सरचे संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ संशयित रुग्णांमध्ये ३३ रुग्णांना कॅन्सर झाले असल्याचे निदानानंतर स्पष्ट झाले आहे़असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना क्षय, मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, पक्षाघात, हृदयरोग आणि कुष्ठरोग आदिंचा समावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला होता़ या सर्वेक्षणात घरोघरी फिरून माहिती घेण्यात आली होती. कॅन्सरचा धोका सातत्याने वाढत असताना त्याचे प्राथमिक स्तरावर निदान होणे गरजचे आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वेळीच निदान न झाल्यास हा रोग गंभीर स्वरुप धारण करतो़ यामध्ये महिलांच्या स्तनांचा कॅन्सर तसेच तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. स्तनाच्या कॅन्सरप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर याचीही चाचणी करण्यात आली़जिल्ह्यात ५७३ लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत़ यातील ३३ रुग्णांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामध्ये २५ जणांना तोंडाचा, तर ८ महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. तसेच तंबाखूच्या अतिसेवनामुळे पुरुषांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.शहराप्रमाणे ग्रामीण भागात आजही प्रकृतीच्या बदलांना महत्त्व दिले जात नाही़ त्याचा परिणाम म्हणून कॅन्सर असल्याचे उशिरा निदान झाल्यास रूग्ण दगावण्याचीही शक्यता जास्त असते. त्यासाठी असंसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण करताना कॅन्सरची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्यात आली होती़बदलती परिस्थिती आहार अपायकारकसमाजातील बदलती परिस्थिती, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता तसेच दिवसेंदिवस बदलत चाललेला आहार अपायकारक ठरत आहे़ तंबाखूच्या अतिसेवनाप्रमाणे अपायकारक शीतपेये घेणे तसेच केमिकल्सचे आहारातील प्रमाणात वाढ ही कॅन्सर होण्यामागे महत्त्वाची कारणे आहेत़