शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

रत्नागिरीत ५७३ कॅन्सरचे संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ संशयित रुग्णांमध्ये ३३ रुग्णांना कॅन्सर झाले असल्याचे निदानानंतर स्पष्ट झाले आहे़असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना क्षय, मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, पक्षाघात, हृदयरोग आणि कुष्ठरोग आदिंचा समावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला होता़ या सर्वेक्षणात घरोघरी फिरून माहिती घेण्यात आली होती. कॅन्सरचा धोका सातत्याने वाढत असताना त्याचे प्राथमिक स्तरावर निदान होणे गरजचे आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वेळीच निदान न झाल्यास हा रोग गंभीर स्वरुप धारण करतो़ यामध्ये महिलांच्या स्तनांचा कॅन्सर तसेच तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. स्तनाच्या कॅन्सरप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर याचीही चाचणी करण्यात आली़जिल्ह्यात ५७३ लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत़ यातील ३३ रुग्णांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामध्ये २५ जणांना तोंडाचा, तर ८ महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. तसेच तंबाखूच्या अतिसेवनामुळे पुरुषांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.शहराप्रमाणे ग्रामीण भागात आजही प्रकृतीच्या बदलांना महत्त्व दिले जात नाही़ त्याचा परिणाम म्हणून कॅन्सर असल्याचे उशिरा निदान झाल्यास रूग्ण दगावण्याचीही शक्यता जास्त असते. त्यासाठी असंसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण करताना कॅन्सरची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्यात आली होती़बदलती परिस्थिती आहार अपायकारकसमाजातील बदलती परिस्थिती, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता तसेच दिवसेंदिवस बदलत चाललेला आहार अपायकारक ठरत आहे़ तंबाखूच्या अतिसेवनाप्रमाणे अपायकारक शीतपेये घेणे तसेच केमिकल्सचे आहारातील प्रमाणात वाढ ही कॅन्सर होण्यामागे महत्त्वाची कारणे आहेत़