शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

रत्नागिरीत ५७३ कॅन्सरचे संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ संशयित रुग्णांमध्ये ३३ रुग्णांना कॅन्सर झाले असल्याचे निदानानंतर स्पष्ट झाले आहे़असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना क्षय, मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, पक्षाघात, हृदयरोग आणि कुष्ठरोग आदिंचा समावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला होता़ या सर्वेक्षणात घरोघरी फिरून माहिती घेण्यात आली होती. कॅन्सरचा धोका सातत्याने वाढत असताना त्याचे प्राथमिक स्तरावर निदान होणे गरजचे आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वेळीच निदान न झाल्यास हा रोग गंभीर स्वरुप धारण करतो़ यामध्ये महिलांच्या स्तनांचा कॅन्सर तसेच तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. स्तनाच्या कॅन्सरप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर याचीही चाचणी करण्यात आली़जिल्ह्यात ५७३ लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत़ यातील ३३ रुग्णांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामध्ये २५ जणांना तोंडाचा, तर ८ महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. तसेच तंबाखूच्या अतिसेवनामुळे पुरुषांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.शहराप्रमाणे ग्रामीण भागात आजही प्रकृतीच्या बदलांना महत्त्व दिले जात नाही़ त्याचा परिणाम म्हणून कॅन्सर असल्याचे उशिरा निदान झाल्यास रूग्ण दगावण्याचीही शक्यता जास्त असते. त्यासाठी असंसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण करताना कॅन्सरची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्यात आली होती़बदलती परिस्थिती आहार अपायकारकसमाजातील बदलती परिस्थिती, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता तसेच दिवसेंदिवस बदलत चाललेला आहार अपायकारक ठरत आहे़ तंबाखूच्या अतिसेवनाप्रमाणे अपायकारक शीतपेये घेणे तसेच केमिकल्सचे आहारातील प्रमाणात वाढ ही कॅन्सर होण्यामागे महत्त्वाची कारणे आहेत़