शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘रत्नदुर्ग’च्या कार्यकर्त्यांनी ७० जणांना नेले सुरक्षितस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : चिपळूणमध्ये महापुराचे पंधरा ते वीस फूट पाणी, पावसाचा जोर, विजेच्या तारा, वाहत येणारे लाकडाचे ओंडके यांचा सामना ...

रत्नागिरी : चिपळूणमध्ये महापुराचे पंधरा ते वीस फूट पाणी, पावसाचा जोर, विजेच्या तारा, वाहत येणारे लाकडाचे ओंडके यांचा सामना करत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सने रेस्क्यू ऑपरेशन केले. पोलिसांच्या सूचनेनुसार खेर्डी येथील एक किलोमीटरच्या परिसरात सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत ७० जणांना सुरक्षितस्थळी नेण्यात यश मिळाले.

रेस्क्यू ऑपरेशन करताना प्रथम एक तीन मजली इमारत निश्चित करून आसपासच्या परिसरातील लहान घरे शोधण्यात आली. तिथे अडकलेल्यांना सुखरूप बोटीतून या इमारतीमध्ये आणले. यामध्ये छोट्या घरांत अडकलेल्या लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि काही रुग्णांना यशस्वी मोठ्या इमारतींमध्ये सुरक्षित नेले. या टीमसाेबत गावखडीतील पुराच्या पाण्यात होडी चालवणारे अनुभवी व पट्टीचे पोहणारे ड्रायव्हरही होते. ही टीम राई, भातगाव, आबलोली मार्गे सायंकाळी ४ वाजता चिपळूणला पोहोचली. सोबत बोट, ट्रक आणि आरटीओची गाडीही होती. रेस्क्यूसाठी एकच फायबर बोट मिळाली. पाण्याच्या खडतर प्रवाहात प्रशिक्षित व पारंगत होडीचालकांमुळे रत्नदुर्गची टीम तग धरू शकली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने मजबूत, दर्जेदार आणि चांगल्या क्षमतेचे इंजिन असणारी बोट दिल्यामुळे या महापुरात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले.

बोट पलटी होऊ नये म्हणून नागरिकांना बोटीत बसवत आणि दोन्ही बाजूंनी पोहत जात. हे प्रशिक्षित स्वयंसेवक वेगवेगळ्या दिशांना पोहत जात जवळच्या घरांमध्ये किती जण अडकले आहेत, याची माहिती घेत व तिथे बोट नेत होते. यामुळे वेळ वाचला. या बचाव कार्यानंतर दोन तास पायी प्रवास करून पोलीस स्थानक गाठले. त्यांच्यासमवेत पोलीस कॉन्स्टेबल अभिजित सकपाळ हेही होते.

----------------------------------

लहान मुलांना प्राधान्य

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रथम लहान मुले, महिला, वृद्धांना प्राधान्य दिले. यामध्ये दीड महिन्याच्या बाळापासून अगदी १०१ वर्षांची आजी आणि काही रुग्णही होते. रत्नदुर्गचे हे काम पाहताना घरात अडकलेल्या काही महिलांनी चहा देतो, असे सांगितले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. बचावलेल्या काही व्यक्तींनी मानधनही देण्याची तयारी दाखवली.

------------------------------

टीम रत्नदुर्ग

रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स रेस्क्यू टीममध्ये वीरेंद्र वणजू, गणेश चौघुले, गौतम बाष्टे, किशोर सावंत, पराग सुर्वे, सुनील डोंगरे, चिन्मय सुर्वे सहभागी झाले हाेते. त्यांच्या मदतीला गावखडीतील अनुभवी आणि पट्टीचे पोहणारे टीममध्ये निनाद पाटील, जयदीप तोडणकर, अब्बास दरवेश, अयुब दरवेश, फजल पांढरे हेही हाेते.

------------------------------

.. अन् बोट अडकली

पाणी सुमारे पंधरा फुटांच्या वर होते. बोट तीन-चार वेळा अडकली होती. एकदा तिथे ट्रकच्या टपात नंतर एका घराच्या कौलांना लागली व एकदा इमारत बांधकामासाठी लावलेल्या पत्र्यांनाही लागली. दुसऱ्या दिवशी त्याच भागातून जाताना आपली बोट कुठे असेल, याचा अंदाज घेतल्यानंतर आश्चर्य वाटल्याचे रत्नदुर्गच्या सदस्यांनी सांगितले.