शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

रत्नागिरीच्या विनयचा ‘सुवर्ण’नेम

By admin | Updated: June 17, 2014 01:18 IST

पूर्व राष्ट्रीय निवड स्पर्धेसाठी निवड : महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी कला, क्रीडा नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कोकणच्या सुपूत्रांनी ठसा उमटविला आहे. नेमबाजीसारख्या स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी जागा उपलब्ध नसतानासुध्दा जिद्द व चिकाटीच्या जोरावर रत्नागिरीचे सुपूत्र विनय देसाई यांनी राज्यस्तरावर विजय संपादन करत रत्नभूमीला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. रत्नागिरी शहर रायफल क्लब स्थापित असून महाराष्ट्र रायफल असोसिएशनशी संलग्न कार्यरत आहेत. या क्लबचे २२ सदस्य आहेत. मात्र या मंडळींना आवड असतानाही स्पर्धेसाठी सराव करण्याकरीता स्वतंत्र मैदान अथवा जागा उपलब्ध होत नाही. हॉटेल व्यावसायिक असलेल्या विनय देसाई यांनी आपली आवड जपत नुकत्याच झालेल्या कॅप्टन एस. जे. इजीकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप नोव्हायसेस स्पर्धेत (२५ मीटर प्रकारात) सुवर्णपदक मिळविले आहे. हॉटेल व्यवसायिकांची जबाबदारी सांभाळत विनय यांनी नेमबाजीची आवड जपली आहे. रत्नागिरीत हेमंत कीर, बंधू विशाल व विक्रांत देसाई यांचे त्यांना सदैव मार्गदर्शन लाभते. स्पर्धेसाठी तयारी करावयाची असेल तर सराव आवश्यक आहे. मात्र रत्नागिरीत सराव करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मुंबई गाठावी लागते. मुंबईत गेल्यानंतर अर्जून पुरस्कार विजेते शीला कानुंगे, अशोक पंडित यांचे मार्गदर्शनाखाली विनय नेमबाजीचे धडे घेतात. आॅल इंडिया जी. व्ही मावळंकर स्पर्धेत निवड झाल्यानंतर पहिल्या १० मीटर प्रकारात यश संपादन केलेल्या विनय यांची नोव्हायसेस चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली. दहा मीटर एअरफीस्टल व २५ मीटर फायरआर्म स्पर्धेत यश मिळविले. राज्य स्पर्धेतील यशानंतर देसाई यांची आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये अहमदाबाद येथे जी. व्ही. मावळंकर पूर्व राष्ट्रीय निवड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत दहा, पंचवीस व पन्नास मीटर अशा प्रकारात देसाई खेळणार आहेत. रत्नागिरी शहर लहान असले तरी या ठिकाणी प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध नाही. येथील खेळाडूंना आपली आवड जपण्यासाठी पंधरा वीस हजार रूपये खर्च करून मुंबई, पुणे गाठावी लागते. शिवाय अन्य कामकाजाकडे दुर्लक्ष करावे लागते. राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यापूर्वी दोन आठवडे मुंबईत राहून सराव करीत होतो, असे देसाई यांचं म्हणणे आहे. पोलिसांसाठी गोळीबार सराव करण्यासाठी फणशी येथील मैदानाचा वापर नेमबाजी सरावासाठी रत्नागिरी शहर रायफल क्लबकरीता उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व सदस्यांनी पोलिस अधिक्षक डॉ. संजय शिंदे यांची भेट घेवून निवेदन सादर केले आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून सरावासाठी स्वतंत्र मैदानाकरिता सुमारे अडीच एकर जागेसाठी मागणी करणार असल्याचे सांगितले जेणेकरून त्या मैदानात १०, २५ व ५० मीटर प्रकारात नेमबाजीचा सराव करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूंकडे स्वत:ची बंदूक असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा वापर सरावासाठी करण्यात येईल, कारण ज्यावेळी सरावासाठी मुंबई, पुणे येथे सरावासाठी गेल्यानंतर त्यावेळी तेथील स्पर्धक किंवा उपलब्ध शस्त्र वापरावे लागते. मात्र आधीच्या वापरलेल्या स्पर्धकांनी आपल्या सोयीसाठी बदल केलेला असतो. त्यामुळे त्या बंदूकीचा वापर करताना अवघड होते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना बंदूकीची गरज आहे, असे विनय यांचे म्हणणे आहे.