शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

रत्नागिरीच्या विनयचा ‘सुवर्ण’नेम

By admin | Updated: June 17, 2014 01:18 IST

पूर्व राष्ट्रीय निवड स्पर्धेसाठी निवड : महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी कला, क्रीडा नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कोकणच्या सुपूत्रांनी ठसा उमटविला आहे. नेमबाजीसारख्या स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी जागा उपलब्ध नसतानासुध्दा जिद्द व चिकाटीच्या जोरावर रत्नागिरीचे सुपूत्र विनय देसाई यांनी राज्यस्तरावर विजय संपादन करत रत्नभूमीला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. रत्नागिरी शहर रायफल क्लब स्थापित असून महाराष्ट्र रायफल असोसिएशनशी संलग्न कार्यरत आहेत. या क्लबचे २२ सदस्य आहेत. मात्र या मंडळींना आवड असतानाही स्पर्धेसाठी सराव करण्याकरीता स्वतंत्र मैदान अथवा जागा उपलब्ध होत नाही. हॉटेल व्यावसायिक असलेल्या विनय देसाई यांनी आपली आवड जपत नुकत्याच झालेल्या कॅप्टन एस. जे. इजीकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप नोव्हायसेस स्पर्धेत (२५ मीटर प्रकारात) सुवर्णपदक मिळविले आहे. हॉटेल व्यवसायिकांची जबाबदारी सांभाळत विनय यांनी नेमबाजीची आवड जपली आहे. रत्नागिरीत हेमंत कीर, बंधू विशाल व विक्रांत देसाई यांचे त्यांना सदैव मार्गदर्शन लाभते. स्पर्धेसाठी तयारी करावयाची असेल तर सराव आवश्यक आहे. मात्र रत्नागिरीत सराव करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मुंबई गाठावी लागते. मुंबईत गेल्यानंतर अर्जून पुरस्कार विजेते शीला कानुंगे, अशोक पंडित यांचे मार्गदर्शनाखाली विनय नेमबाजीचे धडे घेतात. आॅल इंडिया जी. व्ही मावळंकर स्पर्धेत निवड झाल्यानंतर पहिल्या १० मीटर प्रकारात यश संपादन केलेल्या विनय यांची नोव्हायसेस चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली. दहा मीटर एअरफीस्टल व २५ मीटर फायरआर्म स्पर्धेत यश मिळविले. राज्य स्पर्धेतील यशानंतर देसाई यांची आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये अहमदाबाद येथे जी. व्ही. मावळंकर पूर्व राष्ट्रीय निवड स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत दहा, पंचवीस व पन्नास मीटर अशा प्रकारात देसाई खेळणार आहेत. रत्नागिरी शहर लहान असले तरी या ठिकाणी प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध नाही. येथील खेळाडूंना आपली आवड जपण्यासाठी पंधरा वीस हजार रूपये खर्च करून मुंबई, पुणे गाठावी लागते. शिवाय अन्य कामकाजाकडे दुर्लक्ष करावे लागते. राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्यापूर्वी दोन आठवडे मुंबईत राहून सराव करीत होतो, असे देसाई यांचं म्हणणे आहे. पोलिसांसाठी गोळीबार सराव करण्यासाठी फणशी येथील मैदानाचा वापर नेमबाजी सरावासाठी रत्नागिरी शहर रायफल क्लबकरीता उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व सदस्यांनी पोलिस अधिक्षक डॉ. संजय शिंदे यांची भेट घेवून निवेदन सादर केले आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून सरावासाठी स्वतंत्र मैदानाकरिता सुमारे अडीच एकर जागेसाठी मागणी करणार असल्याचे सांगितले जेणेकरून त्या मैदानात १०, २५ व ५० मीटर प्रकारात नेमबाजीचा सराव करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूंकडे स्वत:ची बंदूक असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा वापर सरावासाठी करण्यात येईल, कारण ज्यावेळी सरावासाठी मुंबई, पुणे येथे सरावासाठी गेल्यानंतर त्यावेळी तेथील स्पर्धक किंवा उपलब्ध शस्त्र वापरावे लागते. मात्र आधीच्या वापरलेल्या स्पर्धकांनी आपल्या सोयीसाठी बदल केलेला असतो. त्यामुळे त्या बंदूकीचा वापर करताना अवघड होते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंना बंदूकीची गरज आहे, असे विनय यांचे म्हणणे आहे.