शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

'खेलो इंडिया'मध्ये अचूक वेधासाठी रत्नागिरीची ईशा पवार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 13:31 IST

देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

चिपळूण : देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. डेरवणच्या एसव्हीजेसीटी अ‍ॅकॅडमी येथे ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत होणा-या खेलो इंडिया स्पर्धेसाठी ईशा सराव करत आहे. महाराष्ट्रातून खेलो इंडियाच्या धुनर्विद्या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड झाली असून, रत्नागिरीतून ईशा एकमेव पात्र ठरली आहे.

या स्पर्धेसाठी पुण्याचे ६, बुलडाण्याचे ३, अहमदनगरचे २, अमरावतीचे २, तर मुंबईच्या एका खेळाडूची निवड झाली आहे. जबलपूर येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत पदक जिंकल्याने ईशा आता पहिल्या वहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत अचूक वेध घेण्यासाठी सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झालेल्या ईशाने खेलो इंडियामध्ये अचूक वेध घेऊन जिल्ह्याचे नाव रोशन करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ती तयारी करत आहे. धनुर्विद्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले, ओेंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनामुळेच ईशाने धनुर्विद्या खेळातील कम्पाऊंड प्रकारात मोठी मजल मारली आहे. गेली अनेक वर्षे कम्पाऊंड धनुष्य हा प्रकार शालेय स्पर्धेत समाविष्ट नव्हता. प्रथमच कम्पाऊंड प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. विजेत्याला पुढील ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये दरवर्षी शासनातर्फे देण्यात येणार आहेत.

पुण्यात कसून सराव केल्यानंतर ईशाच्या चेहऱ्यावर विजेतेपदाचा आत्मविश्वास प्रगट होत आहे. ती म्हणाली की, रणजीत सर आणि ओंकार सर माझ्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. त्यांच्या कष्टाचे मी चीज करेन. स्पर्धेत पदक जिंकून डेरवण, रत्नागिरी आणि महाराष्ट्राचाही  झेंडा फडवेन, असा विश्वास तिने व्यक्त केला.

‘सुवर्णकन्ये’च्या नावावर ६० पदके

राज्य स्पर्धेत गेली तीन वर्षे सुवर्ण पदकाची हॅटट्रिक करणाऱ्या ईशाने राष्ट्रीयस्तरावर आपल्या यशाची पताका फडकवत ठेवल्या आहेत. ४० राज्य व २० राष्ट्रीय अशी ६० पदके तिच्या नावापुढे झळकत असून, कोकणची सुवर्णकन्या असा तिने लौकिक प्राप्त केला आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरीतून ४०पेक्षा अधिक क्रीडा प्रकारात शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व खेळात ईशा ही एकमेव खेळाडू रत्नागिरीतून खेलो इंडियाच्या मैदानात चमकताना दिसणार आहे.