शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

'खेलो इंडिया'मध्ये अचूक वेधासाठी रत्नागिरीची ईशा पवार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 13:31 IST

देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

चिपळूण : देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. डेरवणच्या एसव्हीजेसीटी अ‍ॅकॅडमी येथे ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत होणा-या खेलो इंडिया स्पर्धेसाठी ईशा सराव करत आहे. महाराष्ट्रातून खेलो इंडियाच्या धुनर्विद्या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड झाली असून, रत्नागिरीतून ईशा एकमेव पात्र ठरली आहे.

या स्पर्धेसाठी पुण्याचे ६, बुलडाण्याचे ३, अहमदनगरचे २, अमरावतीचे २, तर मुंबईच्या एका खेळाडूची निवड झाली आहे. जबलपूर येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत पदक जिंकल्याने ईशा आता पहिल्या वहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत अचूक वेध घेण्यासाठी सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झालेल्या ईशाने खेलो इंडियामध्ये अचूक वेध घेऊन जिल्ह्याचे नाव रोशन करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ती तयारी करत आहे. धनुर्विद्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले, ओेंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनामुळेच ईशाने धनुर्विद्या खेळातील कम्पाऊंड प्रकारात मोठी मजल मारली आहे. गेली अनेक वर्षे कम्पाऊंड धनुष्य हा प्रकार शालेय स्पर्धेत समाविष्ट नव्हता. प्रथमच कम्पाऊंड प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. विजेत्याला पुढील ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये दरवर्षी शासनातर्फे देण्यात येणार आहेत.

पुण्यात कसून सराव केल्यानंतर ईशाच्या चेहऱ्यावर विजेतेपदाचा आत्मविश्वास प्रगट होत आहे. ती म्हणाली की, रणजीत सर आणि ओंकार सर माझ्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. त्यांच्या कष्टाचे मी चीज करेन. स्पर्धेत पदक जिंकून डेरवण, रत्नागिरी आणि महाराष्ट्राचाही  झेंडा फडवेन, असा विश्वास तिने व्यक्त केला.

‘सुवर्णकन्ये’च्या नावावर ६० पदके

राज्य स्पर्धेत गेली तीन वर्षे सुवर्ण पदकाची हॅटट्रिक करणाऱ्या ईशाने राष्ट्रीयस्तरावर आपल्या यशाची पताका फडकवत ठेवल्या आहेत. ४० राज्य व २० राष्ट्रीय अशी ६० पदके तिच्या नावापुढे झळकत असून, कोकणची सुवर्णकन्या असा तिने लौकिक प्राप्त केला आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरीतून ४०पेक्षा अधिक क्रीडा प्रकारात शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व खेळात ईशा ही एकमेव खेळाडू रत्नागिरीतून खेलो इंडियाच्या मैदानात चमकताना दिसणार आहे.