शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

रत्नागिरीत तिसऱ्या दिवशीही धुवाधार

By admin | Updated: June 29, 2016 00:05 IST

लांजात युवतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू : कसब्यात गणेश मंदिरावर वडाचे झाड कोसळले

रत्नागिरी : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ७५१.२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लांजात वैभव वसाहत येथे एक युवती विजेच्या धक्क्याने मृत झाली असून, संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे गणेश मंदिरावर वडाचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील आसूद येथील चार घरांना पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे जागोजागी पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सायंकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतली होती. सोमवारी रात्री पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. मंगळवारी दिवसभर पावसाचा हा वेग कायम होता. लांजा वैभव वसाहत येथे पाऊस असल्याने प्रणिता महादेव भोसले (वय १९) ही युवती घराच्या पायऱ्यांवर कपडे धूत होती. त्यानंतर दरवाजा ढकलून ती घरात जात असतानाच विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे ती जागीच ठार झाली.संगमेश्वरातही पावसाचा जोर मंगळवारी कायम होता. तालुक्यातील कसबा येथील गणेश मंदिरावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वडाचे मोठे झाड पडून मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, आसूद येथील चार घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. तहसीलदार कविता जाधव यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून या कुटुंबांना स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. चिपळुणात मुसळधार पावसामुळे नगर परिषदेच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली, तर कात्रोळी येथे सोमवारी एका घराची भिंत कोसळली. दरम्यान, तालुक्यातील वीर देवपाट येथील दरडग्रस्त भागाची तहसीलदार जीवन देसाई व उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांनी पाहणी केली.मंडणगड, राजापूर, गुहागर, आदी भागांत पावसाचा वेग त्या मानाने कमी आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असला तरीही शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड तालुक्यातही पावसाने जोर पकडला असून, नातूनगरसह अन्य धरणे पाण्याने भरली आहेत. (प्रतिनिधी)पावसाचा वेगही वाढणारयेत्या २४ तासांसाठी हवामान खात्याने कोकणात सावधानतेचा इशारा दिला आहे. २८ जूनपासून पुढील २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात ७ ते ८ से.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर त्यापुढील २४ तासात ७ ते १२ से.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.