शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दिवाळी आली तरी रेशन धान्य दुकानात खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:06 IST

पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे.

ठळक मुद्देआंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य राहिले पडून गोदामकीपर संपात सहभागी असल्याने धान्य वाहतूकही ठप्पफटका ग्रामीण जनतेला, दिवाळीपूर्वी धान्य मिळण्याबाबत चिंतागावातील जनतेची धान्यासाठी दुकानात हेलपाटे

रत्नागिरी , दि. १२ : पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीपूर्वी धान्य मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे.

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदोन्नतीची पदे सरळसेवेतून थेट भरली जावीत तसेच पुरवठा विभागाची स्वतंत्र आस्थापना करावी, हे निर्णय शासनाने रद्द करावेत, या मागणीसाठी पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ सप्टेंबरपासून पुरवठा विभागाचे काम पूर्णपणे थांबविले आहे. त्यामुळे रेशनकार्डचे वितरण, नावे कमी करणे - चढविणे आदी कामांबरोबरच जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये अजून धान्यच आलेले नाही.

३ सप्टेंबरपासून कर्मचाºयांनी पुरवठा विभागाचे काम बंद केले आहे. गोदामात दोन महिन्यांचा धान्यसाठा असला तरी प्रत्येक तालुक्यात धान्याची मागणी करण्यासाठी आवश्यक असणारे चलन अद्याप दुकानदारांनी भरलेले नाही. त्यामुळे त्यांना धान्याची उचल गोदामातून करता येत नाही. गोदामकीपर संपात सहभागी असल्याने विभागाकडून धान्याची वाहतूकही ठप्प झाली आहे.

याचा फटका ग्रामीण जनतेला अधिक बसला आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. मात्र, अजूनही रेशन दुकानात खडखडाट असल्याने दिवाळी धान्याविना कोरडीच जाणार की काय, अशी चिंता सतावत आहे.

पुरवठा विभागाचे काम बंद होऊन रेशनदुकानदारांना दरदिवशी संप मिटवण्याची प्रतीक्षा करावी लागत आता ९ दिवस झाले. अजूनही संप मिटण्याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. रेशनदुकानदारांना चलन भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.

गोदामात धान्य असले तरी जिल्ह्यातील ९१५ रेशनदुकानात धान्याचा खडखडाट आहे. ग्रामीण भागातील जनता दरदिवशी दुकानात येऊन धान्य कधी येणार, अशी आतुरतेने विचारणा करीत आहेत. दिवाळीपूर्वी तरी हा संप मिटेल, अशी आशा जनतेला वाटत आहे.गोदामात धान्य असले तरी सध्या रेशनदुकानात धान्याचा कण नसल्याने ही दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. चलन भरून मागणी नोंदविण्यासाठी दुकानदारांना तहसील कार्यालयात दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. गावातील जनता धान्यासाठी दुकानात हेलपाटे मारत आहेत.- प्रशांत पाटील,रेशनदुकानदार, कोळंबे, ता. रत्नागिरी

टॅग्स :diwaliदिवाळीfoodअन्न