शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिवाळी आली तरी रेशन धान्य दुकानात खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:06 IST

पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे.

ठळक मुद्देआंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य राहिले पडून गोदामकीपर संपात सहभागी असल्याने धान्य वाहतूकही ठप्पफटका ग्रामीण जनतेला, दिवाळीपूर्वी धान्य मिळण्याबाबत चिंतागावातील जनतेची धान्यासाठी दुकानात हेलपाटे

रत्नागिरी , दि. १२ : पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीपूर्वी धान्य मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे.

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदोन्नतीची पदे सरळसेवेतून थेट भरली जावीत तसेच पुरवठा विभागाची स्वतंत्र आस्थापना करावी, हे निर्णय शासनाने रद्द करावेत, या मागणीसाठी पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ सप्टेंबरपासून पुरवठा विभागाचे काम पूर्णपणे थांबविले आहे. त्यामुळे रेशनकार्डचे वितरण, नावे कमी करणे - चढविणे आदी कामांबरोबरच जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये अजून धान्यच आलेले नाही.

३ सप्टेंबरपासून कर्मचाºयांनी पुरवठा विभागाचे काम बंद केले आहे. गोदामात दोन महिन्यांचा धान्यसाठा असला तरी प्रत्येक तालुक्यात धान्याची मागणी करण्यासाठी आवश्यक असणारे चलन अद्याप दुकानदारांनी भरलेले नाही. त्यामुळे त्यांना धान्याची उचल गोदामातून करता येत नाही. गोदामकीपर संपात सहभागी असल्याने विभागाकडून धान्याची वाहतूकही ठप्प झाली आहे.

याचा फटका ग्रामीण जनतेला अधिक बसला आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. मात्र, अजूनही रेशन दुकानात खडखडाट असल्याने दिवाळी धान्याविना कोरडीच जाणार की काय, अशी चिंता सतावत आहे.

पुरवठा विभागाचे काम बंद होऊन रेशनदुकानदारांना दरदिवशी संप मिटवण्याची प्रतीक्षा करावी लागत आता ९ दिवस झाले. अजूनही संप मिटण्याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. रेशनदुकानदारांना चलन भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.

गोदामात धान्य असले तरी जिल्ह्यातील ९१५ रेशनदुकानात धान्याचा खडखडाट आहे. ग्रामीण भागातील जनता दरदिवशी दुकानात येऊन धान्य कधी येणार, अशी आतुरतेने विचारणा करीत आहेत. दिवाळीपूर्वी तरी हा संप मिटेल, अशी आशा जनतेला वाटत आहे.गोदामात धान्य असले तरी सध्या रेशनदुकानात धान्याचा कण नसल्याने ही दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. चलन भरून मागणी नोंदविण्यासाठी दुकानदारांना तहसील कार्यालयात दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. गावातील जनता धान्यासाठी दुकानात हेलपाटे मारत आहेत.- प्रशांत पाटील,रेशनदुकानदार, कोळंबे, ता. रत्नागिरी

टॅग्स :diwaliदिवाळीfoodअन्न