शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

रंगोबा साबळे रस्ता दुरुस्ती आज मार्गी लागणार?

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

चिपळूण पालिका : काम तत्काळ करण्यासाठी नगराध्यक्षांनी दिले पत्र...

चिपळूण : बॅ. नाथ पै चौक ते भाजी मंडईदरम्यान रंगोबा साबळे रस्त्यावरील गटाराचे काम उद्या (गुरुवारी) केले जाणार आहे. येथे नागरिकांनी विरोध केल्यास अडचण नको म्हणून पोलिसांना पत्र देण्यात आले आहे, तर वाहतूक बंद करण्यासाठी एस. टी. महामंडळाला कळविण्यात आले आहे. हे काम तत्काळ व्हावे, यासाठी आज (बुधवारी) येथील नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. रंगोबा साबळे रस्त्यावर एका हॉटेलसमोर सांडपाणी रस्त्यावरुन जात असल्याने मोठा खड्डा पडला आहे. येथील गटार चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन येथे महिला पडली आणि पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला. रिक्षाचालक संघटनेचे दिलीप खेतले, रवींद्र घाडगे, राजू भोसले, अकलाक शिरगावकर, दादा लकेश्री, अशोक गांधी, संजय कदम, समीर गांधी, श्रीकांत नटे, प्रदीप नलावडे, मंदार मोरे, दत्ताराम उदेग, मुराद दुसेणी, खाटीकआळी येथील फैसल पिलपिले, इम्रान कुरेशी, शौकत कुरेशी, सुभाष खेरटकर, जुल्फिकार शेख, युनूस मेमन, मुदस्सर तांबे, अफजल मेमन आदींनी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यानंतर येथील प्रश्न चर्चेत आला. हा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहे. येथील नागरिकांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला.नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने रात्री तातडीने घटनास्थळी जाऊन काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथे पुरेसा प्रकाश नव्हता. शिवाय स्थानिक ग्रामस्थांनी गटारात पाणी सोडण्यास मज्जाव केला. म्हणून मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर नगराध्यक्षांशी चर्चा करुन कर्मचारी काम न करताच परतले. आज (बुधवारी) नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांनी मुख्याधिकाऱ्यांना काम तातडीने सुरु करावे व लोकांची गैरसोय दूर करावी. अन्यथा होणाऱ्या जनप्रक्षोभास आपण जबाबदार राहाल, अशा आशयाचे पत्र दिले.त्यानुसार तातडीने काम करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. बांधकाम विभागाने एस. टी. महामंडळ व पोलीस निरीक्षकांना पत्र दिले आहे. स्थानिक नागरिक गटारात पाणी सोडण्यास विरोध करीत असल्याने गरज पडल्यास पोलीस संरक्षणात काम करावे, असे यापूर्वीच ठरले आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात काम करण्याची तयारी नगर परिषदेने केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडणार? याकडे परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच प्रतिसाद दिला असता तर हे काम मार्गी लागले असते. या मार्गावरील खड्ड्यामुळे व घाणीच्या सांडपाण्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. शिवाय लहान मोठे अपघातही होत आहेत. पालिकेने याबाबत वेळीच पावले उचलली नाहीत, तर या भागातील रिक्षाचालक व नागरिक तीव्र आंदोलन छेडणार आहेत.